वनखात्याने विविध रोपे उपलब्ध करावीत : नियोजनाअभावी अनेक रोपे जातात वाया, शेतकऱयांनीही पुढाकार घेणे गरजेचे
प्रतिनिधी /बेळगाव
‘झाडे लावा देश वाचवा’चा संदेश सध्या देशभर फिरू लागला आहे. या दृष्टिकोनातून तालुक्मयातही पावसाच्या तोंडावर विविध योजना राबविल्या जाणार आहेत. दरम्यान, उद्योग खात्री योजनेतून यावषी तालुक्मयात हजारो रोपे लावण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. मात्र याचे नियोजन नसल्याचे दिसून येत आहे. जर पावसाळय़ात रोप लागवडीसाठीचे नियोजन आतापासून केल्यास रोपे टिकतील व मोठीही होतील. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देऊन वनखात्याने नियोजन करण्याची गरज निर्माण झाली
आहे.
जनजागृतीवर अधिक भर देणे गरजेचे आहे. झाडे जगली तरच देश वाचू शकतो. त्यासाठी वनखात्याकडून अनेक रोपे तयार करण्यावर भर देण्यात येत आहे. दरम्यान, शेतकऱयांनी पुढाकार घेतला नसल्याने अनेक ग्राम पंचायतींमध्ये रोपे लावण्याची मोहीम बारगळल्याचे दिसते. शेतकऱयांनी शेतातील खुल्या जागेत अथवा बांधांवर झाडे लावावीत, असे आवाहन करण्यात आले. तरीही पिकांचा विचार करून कोणतेच शेतकरी बांधावर झाडे लावण्यास तयार नसल्याने अद्यापही हजारो रोपटी तशीच पडून असतात, ही दरवषीचीच बाब आहे. त्यामुळे शेतकऱयांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही अधिकाऱयांतून करण्यात येत आहे.
गतवषीही उद्योग खात्री योजनेतून हजारो रोपे लावण्यात आली होती. यावषीही आता ही मोहीम राबविण्यात येणार असली तरी यामधील किती रोपे जगतात? हा प्रश्न अंतर्मुख करणारा आहे. तालुक्मयात 10 हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट असल्यास त्यामधील किमान 9 हजार तरी रोपटी जगली पाहिजेत. त्यामुळे हवामानातील बदल जाणवेल. मात्र 10 हजारपैकी केवळ 500 रोपटीच टिकली तर म्हणावा तसा बदल घडणार नाही. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
अनेक जण रोपटी लावण्याकडे कानाडोळा करतात. हजारो रोपटी शिल्लक पडतात. काही ग्राम पंचायतीच्या माध्यमातून अनेक शेतकऱयांनी याचा लाभ घेतला आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून रोहयोतून देशात विविध योजना राबविण्यात येत असतात. रोप लागवडीचीही मोहीम यशस्वीपणे राबविण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. दरम्यान, रोपांसाठी लागणारे खड्डे व त्यासाठी आवश्यक कामकाजही रोहयोच्या माध्यमातून करण्यात येते. त्यामध्ये रोपेही लावली जातात. मात्र ती जगविण्यासाठी प्रयत्न होत नसल्याचे दिसून येत आहे.
अनेक शेतकरी अल्पभूधारक आहेत. त्यामुळे शेतामध्ये वृक्षलागवड केल्यास त्याचे मोठे नुकसान होवू शकते. झाडाखालील पीक वाया जाणार, अशी भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्रास शेतकरी रोप लागवडीकडे कानाडोळा करतात. अनेक ठिकाणी लावलेल्या वृक्षाकडून दुर्लक्ष करण्यात येते. त्यामुळेच अनेक रोपटी खराब होतात.
प्रत्येकाने किमान एक तरी रोप लावणे आवश्यक
रोपांची होणारी कत्तल आणि तापमानात होणाऱया वाढीमुळे भविष्यात हे संकट मोठे असणार यात शंका नाही. त्या दृष्टिकोनातून पावसाळय़ापूर्वी किमान प्रत्येकाने एक तरी रोप लावले पाहिजे, असा नारा देण्यात येत आहे. सध्या तालुक्मयात हजारो रोपे लावण्यात येणार असल्याचे उद्दिष्ट आखण्यात आले असले तरी त्याला योग्यप्रकारे नियोजन नसल्यामुळे दरवषी रोपे जगविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. दरम्यान, वनखात्याकडून सागवान, काजू, लिंबू, पेरु व इतर जातींची रोपटी संबंधित ग्राम पंचायतींना देण्यावर भर दिला आहे. त्यासाठी आतापासूनच नियोजन करून प्रत्येक ग्राम पंचायत व विविध संघ-संस्थांच्या माध्यमातून नियोजन केल्यास तालुका हिरवाईने नटणार आहे. त्यासाठी मोठय़ा प्रमाणात प्रयत्न करणे गरजेचे आहे.