अनेक दिवसांपर्यंत वृक्षांना स्पर्श न करणारे लोक
शहरी जीवनाच्या व्यग्र दिनक्रमामुळे लोक अनेक दिवसांपर्यंत वृक्षांना स्पर्श न करता जगत आहेत. यामुळे हे लोक रोपांबद्दल कमी संवेदनशील होत चालले असून त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहेत. ब्रिटनच्या एक्सटर युनिव्हर्सिटीच्या एका संशोधनात रोपांशी संबंधित हालचालींपासून सर्व वयोगटातील लोक हळूहळू दूर जात असल्याचे आढळून आले आहे. तज्ञांनी याला प्लांट ब्लाइंडनेस नाव दिले आहे.
कुठल्याही झाडाच्या फांदीला स्पर्श न केल्यास आणि कुठल्याही झाडाच्या पानांकडे कुतुहूलाने बघून लोकांना अनेक दिवस उलटलेले असतात. परंतु जे लोक झाड-रोपांवर निर्भर असतात, किंवा सातत्याने त्यांच्या सहवासात असतात असे लोक झाडांना चांगल्यापासून ओळखू शकतात. असा प्रकार विशेषकरून ग्रामीण समुदायाच्या लोकांसोबत घडतो. त्यांना वृक्ष-रोपांबद्दल अधिक स्वारस्य आणि माहितीही असते. शहरात लोक वृक्ष-रोपांवर कमी निर्भर असतात. याचमुळे ते प्लांट ब्लाइंडनेसला बळी पडतात.
संशोधकांनुसार शहरीकरण आणि आधुनिकीकरणामुळे लोकांना झाडांबद्दलचे ज्ञान नाही. परंतु वृक्ष-रोपांच्या सान्निध्यात जात आणि जंगल-उद्यानांमध्ये वेळ घालवून प्लांट ब्लाइंडनेस कमी केला जाऊ शकतो. प्लांट्स पीपल प्लॅनेट या नियतकालिकात प्रकाशित अध्ययनात लोकांना वृक्षांपासून होणाऱया लाभांची माहिती मिळणे गरजेचे असल्याचे म्हटले गेले आहे.
संशोधनात सर्वसामान्य व्यक्तींना जंगलाचे छायाचित्र दाखविण्यात आले होते. यात प्राणी आणि वृक्ष दोघांचाही समावेश होता. छायाचित्रात काय दिसले अशी विचारणा केल्यावर लोकांनी प्राण्यांबद्दल सांगितले, परंतु वृक्षांकडे दुर्लक्ष केले. यालाच प्लांट ब्लाइंडनेस म्हटले जाते.