बागायत खात्याचा उपक्रम : नरेगाअंतर्गत खड्डय़ांची खोदाई
प्रतिनिधी /बेळगाव
बागायत खात्यामार्फत रोजगार हमी योजनेंतर्गत संतिबस्तवाड ग्राम पंचायतमध्ये काजू रोप लागवडीला प्रारंभ झाला आहे. तब्बल 4 हजार रोपे लावली जाणार असल्याने परिसर काजूच्या बागेने फुलणार असल्याची माहिती बागायत खात्याने दिली आहे.
बागायत खात्यामार्फत दरवषी फळरोपांची लागवड करून बागायत क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विशेषतः सरकारी शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय केंद्र, सरकारी जागा, ग्राम पंचायत, वसतिगृह आदी ठिकाणी फळरोपांची लागवड केली जात आहे. यामध्ये विशेषतः आंबा, पेरू, सीताफळ, फणस, काजू, लिंबू, कडीपत्ता आदी रोपांचा समावेश आहे.
संतिबस्तवाड ग्रा. पं. हद्दीतील जागेमध्ये केवळ काजूच्या रोपांची लागवड केली जात आहे. यासाठी रोजगार हमी योजनेतून खड्डे खोदाई करण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक रोजगार कामगारांना काम उपलब्ध झाले
आहे. जिल्हय़ात बेळगाव आणि खानापूर तालुक्मयात काजू लागवडीचे क्षेत्र अधिक आहे. शिवाय पडिक आणि नापिक जमिनीत काजू लागवड करून उत्पादन वाढीसाठी खात्याचे प्रयत्न सुरू आहेत.
खात्याने आता काजू लागवडीलाही प्राधान्य दिले आहे. संतिबस्तवाड येथील काजू गार्डन परिसरात काजूची लागवड केली जात आहे. त्यामुळे भविष्यात ग्रा. पं. ला उत्पन्न प्राप्त होणार आहे. अलीकडे काजू लागवड करणाऱया शेतकऱयांची संख्या वाढली आहे.
दरम्यान, काजूला समाधानकारक भाव मिळत असल्याने दरवषी काजू लागवड क्षेत्रात वाढ होत आहे. आता बागायत खाते काजू उत्पादनासाठी प्रोत्साहन देत आहे. त्याबरोबर विविध भागात काजू लागवड करीत आहे. त्यामुळे उत्पादनातही वाढ होणार आहे.
तालुक्यातही लागवड करणार
संतिबस्तवाड ग्रा. पं. हद्दीत 4 हजार काजूच्या रोपांची लागवड केली जाणार आहे. या कामाला प्रारंभ झाला आहे. यासाठी नरेगा योजनेचे सहकार्य मिळत आहे. त्यामुळे नरेगा कामगारांना काम मिळत आहे. तालुक्मयातील इतर ठिकाणीही काजूच्या झाडांची लागवड केली जाणार आहे.
– प्रवीण महेंद्रकर (साहाय्यक अधिकारी, बागायत खाते)