प्रतिनिधी / सातारा :
केंद्र सरकारने खतांचे भाव वाढवले होते. आता तुर, मुग, उडीद यासारख्या कडधान्याची आयात सुरु केली आहे. त्याच्या निषेधार्थ प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने घरासमोरच थाळीनाद करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निषेध नोंदवला. या आंदोलनात प्रहार संघटनचे अमोल कारंडे, महेश शिंदे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना अमोल कारंडे म्हणाले, प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मंत्री बच्चु कडु यांच्या मार्गदर्शनाखाली व शेतकऱ्यांना पाठिंबा म्हणून थाळी व टाळी बजाव आंदोलन करण्यात आले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करतो की, आपण एक मागणी मान्य केली आहे. रासायनिक खतांची झालेली दरवाढ मागे घेवून आपण शेतकरी वर्गाला दिलासा दिला आहे. त्याबद्दल आपल अभिनंदन. पण आपण दुसरीकडे तुर, मुग, उडीद यासारखे कडधान्य बाहेरून आयात केले आहे. ती पहिली थांबवावी. मराठवाडा विदर्भात तुरीच उत्पन्न सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात तुर शिल्लक असताना आपण बाहेरून आयात करता ही बाब खेदाची व निंदनीय आहे. आपण शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. तसेच प्रत्येक पिकांवर 50 टक्के हमीभाव दर जाहीर करावा व मालाला उत्पन्न खर्चाच्या दुपट हमी भाव द्यावा.