ऑनलाईन टीम/तरुण भारत
महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा भागातील प्रश्न आणि दोन्ही राज्यातील कटुता संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठीच आजची ही राज्यपालांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. शिवाय दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांची बैठक होणे आवश्यक आहे. असेही उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक राज्याची बैठक प्रथमता प्रशासन पातळीवर करावी, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सूचना आहे. त्यामुळे दोन्ही राज्याचे राज्यपाल या बैठकीला उपस्थित आहेत. त्याशिवाय, दहा जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रमुख उपस्थित आहेत. ही बैठक प्राथमिकता सीमा भागातील प्रश्न सोडवण्यासाठी आहे. अलमट्टी धरण, भाषेचा प्रश्न अन्य समस्यासह दोन्ही राज्यातील कटुता संपवण्याचा पंतप्रधानांचा प्रयत्न असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले.
सीमावाद हा न्यायालयीन भाग आहे. तो प्रश्न कधी संपेल माहिती नाही, मात्र दोन्ही राज्यातील प्रश्न आणि कटुता संपवण्यासाठी दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बैठकीला बसावे लागेल, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.