प्रतिनिधी /पणजी
साहित्य अकादमी, नवी दिल्ली येथे शुक्रवारी झालेल्या कविसंमेलनात गोव्यातील मराठी कवी कवयित्रींनी विविध विषयांवरील कविता सादर करून मान्यवरांना प्रभावित केले.
राष्ट्रीय कवी प्राचार्य देविक रमेश यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कवी संमेलनात हिंदीतील सुप्रसिध्द कवी अलका सिन्हा( प्रजासत्ताक दिनी निघणाऱया संचलनाचे समालोचन करणाऱया ) व कमलेश भट्ट कमल यांनीही यावेळी आपल्या हिंदी कवितांनी सगळय़ांची मने जिंकली.
गोमंतकीय कवी पैकी प्रकाश क्षीरसागर, पौर्णिमा केरकर, रजनी रायकर, शुभदा च्यारी यांनी छान हिंदी कविता सादर केल्या. इतरांनी मराठी कविता सादर केल्या. त्यात ज्ये÷ कवी माधव सटवाणी, दशरथ परब(इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रागांझा चेअध्यक्ष) चित्रा क्षीरसागर, कालिका बापट, आसावरी कुलकर्णी, नितीन कोरगावकर, दीपा मिरिंगकर, शर्मिला प्रभू, समृद्धी केरकर व नागपूर येथील प्रसिद्ध लेखिका विजया मारोतकर यांचा समावेश होता.
दशरथ परब यांनी व कालिका बापट यांनी आपल्या कविता गाऊन सादर केल्या व रंगत आणली. माधव सटवाणी यांनी सादर केलेल्या गझलला उस्फूर्त दाद मिळाली. चित्रा क्षीरसागर, नितीन कोरगावकर, आदींच्या कवितांना प्राचार्य देविक यांनी दाद दिली व या कविसंमेलनाने आनंद मिळाल्याचे सांगितले.
साहित्याचा संबंध भावनांशी असतो. कविता सदैव जिवंत असते, कारण त्यात एक मन असते, असे सांगून देविक रमेश यांनी, सर्व भारतीय भाषातील साहित्य इंग्रजी नव्हे तर हिंदीत अनुवादित होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. मानवता केवळ साहित्यात उरली आहे आणि मानवता वाचविण्यासाठी लेखक, कवी रचना करतात ही मोठी गोष्ट आहे असे ते म्हणाले. कमलेश भट्ट कमल व अलका सिन्हा यांच्या कवितेला भरभरून दाद मिळाली.
साहित्य अकादमीचे सचिव के. श्रीनिवास राव यांनी स्वागत केले. इथे सगळे पदाधिकारी हे मान्यवर साहित्यकि आहेत.
गोव्यात मोठय़ा संघर्षातून कोकणी राज्य भाषा झाली मात्र एकच कोकणी वर्तमानपत्र चालते याबद्दलची वैयक्तिक खंत श्रीनिवास यांनी व्यक्त करून, कोकणी वाचकांची संख्या गोव्यात वाढण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी दशरथ परब यांच्या हस्ते देविक रमेश, अलका सिन्हा व कमलेश भट्ट यांचा सन्मान करण्यात आला. साहित्य अकादमीचे साहाय्यक संपादक अजयकुमार शर्मा यांनी प्रास्ताविक केले. व त्यांनीच आभार मानले.