18 श्वानांनी गमाविला जीव : सरपंचाने आदेश दिल्याचा आरोपीचा दावा
वृत्तसंस्था /विशाखापट्टणम
आंध्रप्रदेशच्या एलुरु जिल्हयात 18 भटक्या श्वानांना विष देत ठार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी संबंधित आरोपीला ताब्यात घेत त्याच्या विरोधात पशूक्रूरता निवारण अधिनियमाच्या अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. गावातील सरपंचाने श्वानांना मारण्याचा आदेश दिला होता असा दावा आरोपीने केला आहे.
चेबरोले गावात ही घटना घडली असून वीरबाबू असे आरोपीचे नाव आहे. गावचा सरपंच आणि ग्रामसेवकाने विषारी इंजेक्शन देत श्वानांना ठार करण्याचा आदेश दिला होता असे आरोपीने चौकशीदरम्यान सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. श्वानांच्या मृत्यूनंतर प्राणीहक्क संघटनांनी संताप व्यक्त करत आरोपींच्या विरोधात त्वरित कारवाईची मागणी केली आहे.