ऑनलाईन टीम / तरुण भारत :
कसबा कुणाचा गड होता आणि लोकांनी काय विचार केला हे सांगण्याची गरज नाही. सत्तेत असूनही भाजपला कसब्यात यश मिळालं नाही. देशात आता सर्वत्र बदलाचे वारे तयार होत असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटले आहे.
पवार आज बारामतीत माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, गेल्या काही दिवसात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तीन-चार निवडणुका झाल्या. एक-दोन जागा सोडल्या तर फारशा जागा भाजपला मिळू शकल्या नाहीत. सरकार त्यांचे, त्यांनी निवडणूकांमध्ये पुर्णपणे आपल्या सत्तेचा वापर केला पण या निवडणूका काय सांगतात, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. केरळमध्ये भाजपा नाही, तामिळनाडूमध्ये भाजपा नाही. देशातल्या अनेक राज्यांमध्ये भाजपा नाही. सध्याचं सगळं चित्र दिसयंत ते देशात बदलाचे वारे आहे. त्याचे परिणाम पुढच्या निवडणुकीत बघायला मिळतील.
अधिक वाचा : अखेर पिंपरी-चिंचवड शास्तीकर मुक्त; एक लाख मिळकतधारकांना दिलासा
पोटनिवडणूक विधान परिषदेत भाजपाला अपेक्षित यश नाही. देशातल्या अनेक राज्यांमध्ये भाजपा नाही. ही गोष्ट आगामी बदलांसाठी अनुकुल आहे, असेही पवार म्हणाले.