पहिल्या पावसातच चिखल : अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने प्रवाशांची गैरसोय
वार्ताहर /खानापूर
खानापूर-लोंढा-रामनगर या राष्ट्रीय महामार्गावर पहिल्याच पावसात यावषीही अनेक ठिकाणी खड्डे पडून चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून लोंढा भागातील नागरिकांना चिखलातूनच प्रवास करावा लागत आहे. मागीलवषी या ठिकाणी रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली. परंतु अनेक ठिकाणी पुन्हा खड्डे पडल्याने पहिल्याच पावसात चिखल झाला आहे. त्यामुळे या राष्ट्रीय महामार्गाची समस्या कधी सुटणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
बेळगाव-पणजी राष्ट्रीय महामार्गापैकी खानापूरपर्यंत राष्ट्रीय महामार्गाचे काम झाले आहे. पण होनकल गावापासून गुंजी-लोंढा-रामनगर व अनमोडपर्यंतच्या महामार्गाचे काम वनखात्याच्या आडमुठय़ा धोरणामुळे व केंद्रीय हरित लवादाच्या जाचक अटीमुळे रखडले आहे. वनखात्याच्या हद्दीतून जाणाऱया या दुपदरी राष्ट्रीय महामार्गाला आडकाठी आल्यानंतर मागील वषी तात्काळ दुरुस्तीसाठी महामार्ग प्राधिकरणाकडून चार कोटींचा निधी मंजूर झाला. यातून राष्ट्रीय महामार्गापैकी पर्यायी रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली. अनेक दलदलीच्या व अवघड ठिकाणच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे तात्पुरती व्यवस्था झाली. पण, या दरम्यान काही प्रमुख ठिकाणी पुन्हा खड्डे पडल्याने पहिल्या पावसातच चिखल झाला आहे.
खानापूरपासून सुरू होणाऱया या राष्ट्रीय महामार्गापैकी माणिकवाडी, सावरगाळी, नायकोल कत्री व लोंढय़ाकडील काही ठिकाणी खड्डे पडून चिखल झाला आहे. त्यामुळे या खड्डय़ातून वाट काढताना प्रवाशांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे या राष्ट्रीय महामार्गाचा प्रश्न कधी सुटणार, असा प्रश्न प्रवासी वर्गातून उपस्थित होत आहे.