कामाच्या भिजत घोंगडय़ाबाबत तक्रार
वार्ताहर /उचगाव
शासनामार्फत गेल्या दोन वर्षांपासून उचगाव बसस्थानक ते गोजगा हा ऍप्रोच रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याच्या निधीतून करण्यात येत आहे. यातील लक्ष्मी गल्लीतील गटारी आणि रस्त्याचे काम अद्याप रेंगाळलेले होते, ते सध्या सुरू करण्यात आले आहे. मात्र सदर काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार येथील नागरिकांनी केली आहे.
लक्ष्मी गल्लीतील नागरिकांनी केलेल्या तक्रारीनुसार गेली दोन वर्षे या रस्त्याचे काम सुरू आहे. ते अतिशय धिम्या गतीने काम चालू असल्याने येथील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. गटारी खणून चार चार महिने काम थांबविले जाते. गटारीचे बांधकाम करण्यासाठी पुन्हा दोन-तीन महिने लागतात, अशाप्रकारे रस्त्याच्या कामाचे हे भिजत घोंगडे कधी पूर्ण होणार, अशी विचारणा या गल्लीतील नागरिकांतून केली जात आहे.
या रस्त्यावरून ये-जा करणाऱया नागरिकांना चिखल, धूळ यांचा सामना करत करत आता पुन्हा पावसाळा उजाडला. मात्र, अद्याप या गल्लीतील रस्त्याच्या गटारीचे काम पूर्णत्वाला गेले नाही. सध्या सुरू असलेले कामही अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार येथील नागरिकांनी केली आहे. तसेच गणपत गल्लीतील अनेक कामे रखडलेली आहेत. गटारी अर्धवट, तसेच रस्त्यांच्या दोन्ही बाजूला बसविण्यात येणारे पेव्हर्स ही सर्व कामे अर्धवट असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
निकृष्ट कामाची चौकशी करा
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वरि÷ अधिकाऱयांनी याची तातडीने दखल घेऊन या कामाची पाहणी करावी. उर्वरित राहिलेली कामे तातडीने पावसाळय़ापूर्वी पूर्ण करावीत, तसेच निकृष्ट दर्जाच्या कामाची कसून चौकशी व तपासणी करावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. अन्यथा जिल्हाधिकाऱयांना यासंदर्भात निवेदन देऊन याची चौकशी करावी, असे निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती येथील नागरिकांनी दिली.