आमदारा प्रवीण आर्लेकर यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी /पेडणे
समाजात परिवर्तन घडवून आणण्याची ताकत पञकारितेमध्ये असते. पत्रकार हा जनमानसाचा आरसा आहे. पञकार आणि साहित्यकि हे आपल्या लेखणीतून समाजाला दिशा दाखविण्याचे काम करत असतात . आपल्या राजकीय प्रवासात मतदारांबरोबरच पञकारांचेही मोठे योगदान असून त्यांनी वेळोवेळो दिलेल्या सहकार्यामुळे, मार्गदर्शनामुळे आपण आमदार झालो, असे प्रतिपादन पेडणे मतदारसंघाचे आमदार व हस्तकला व लघु उद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष प्रवीण आर्लेकर यांनी केले.
पत्रकार, साहित्यिक तथा संपादकीय विभाग प्रमुख राजू भिकारो नाईक यांच्या गौरव समारभात ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की पत्रकार राजू भिकारो नाईक यांनी गोव्याच्या पत्रकारिता तसेच साहित्यिक क्षेत्रात भरीव योगदान दिले असून त्यांचा गौरव करताना आपणास खूप आनंद होत आहे.
यावेळी व्यासपीठावर धारगळ पंचायतीचे सरपंच भूषण नाईक, माजी सरपंच तथा विद्यमान पंच वल्लभ वराडकर, नवचेतना युवक संघाचे अध्यक्ष कृष्णा पालयेकर, पत्रकार महादेव गवंडी व निवृत्ती शिरोडकर आदी उपस्थित होते.
धारगळ पंचायतीचे सरपंच भूषण नाईक म्हणाले की, राजू नाईक यांचे पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्य हे वाखाणणयाजोगे आहे. त्यांचे अनेक लेख सडेतोड, अभ्यासपूर्ण तसेच वाचकाला प्रेरणा देणारे असतात. वर्तमानपत्रातील लेखनाबरोबरच त्यांनी वैशिष्टय़पूर्ण पुस्तके लिहून आपले विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहचवले आहे.
नवचैतन्य युवक संघाचे अध्यक्ष कृष्णा पालयेकर यांनी सांगितले की नाईक यांनी सर्वसामान्य कुटुंबातून जन्माला येऊन आपल्या कार्यकर्तृत्वाने पत्रकारितेच्या तसेच साहित्याच्या माध्यमातून आपला वेगळा असा ठसा त्यांनी उमटवलेला आहे, असे सांगून त्यांनी नाईक यांचा सविस्तर परिचय करुन दिला.
निवृत्ती शिरोडकर म्हणाले की, नाईक यांच्याकडून खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत व त्या आम्ही शिकत आलेलो आहोत. ते अभ्यासू, निष्कलंक, नीर्भीड पत्रकार असून अनेकांचे मार्गदर्शक आहेत.
कोणताही लोकप्रतिनिधी आपल्या वागण्यांतून व बोलण्यांतून लोकांची मने जिंकतो. कृतीशिल राहिल्याने तो लोकांच्या हदयसिंहासनावर विराजमान होतो, म्हणूनच आपण पाहतो काहीजण अनेकवेळा निवडून येतात. प्रवीण आर्लेकरही सध्याचे त्यांचे काय पाहता भविष्यात एक लोकप्रिय आमदार बनतील, असा विश्वास नाईक यांनी व्यक्त केला आणि आपल्यासारख्या छोटय़ा पत्रकाराच्या कार्याची दखल घेऊन सन्मान केल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
स्वागत व प्रास्ताविक महादेव गवंडी यांनी केले. सूत्रसंचालन सिद्धा?त मरुडकर यांनी केले तर हृषीकेश परब यांनी आभार मानले.