वार्ताहर /खानापूर
खानापूर तालुक्मयात 2019-21 या तीन वर्षात झालेल्या अतिवृष्टीमुळे शहर व तालुक्मयातील नागरिकांना पूरस्थितीला सामोरे जावे लागले. यावषीही हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार अतिवृष्टीची शक्मयता आहे. यासाठी तालुक्मयात पूरसदृश ठिकाणी पूरस्थितीचा धोका कसा हाताळता येईल, यासंदर्भात सोमवारी तहसीलदार कार्यालयात अधिकारीवर्गाची बैठक आमदार अंजली निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
बैठकीत तहसीलदार प्रवीण जैन यांनी तालुक्मयात पूर येणाऱया ठिकाणी संभाव्य धोका टाळण्यासाठी उपाययोजनांचे नियोजन करण्यात सरकारी यंत्रणा सज्ज झाली आहे. तालुक्मयात पीकहानी, घरांची पडझड, रस्त्यांचे नुकसान यासंदर्भात प्रत्येक विभागातील संबंधित अधिकाऱयांकडून माहिती घेण्यात येत आहे, असे सांगितले.
चार शाळांच्या खोल्या जमीनदोस्त
तालुक्मयात सोमवारपर्यंत झालेल्या अतिवृष्टीत यावषी चार शाळाखोल्यांचे नुकसान झाले आहे. यामध्ये गर्लगुंजी, मुडेवाडी, सिंगीनकोप येथील मराठी शाळा तर मुगळीहाळ येथील शाळेचा समावेश आहे. या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना दुसऱया ठिकाणी शिक्षण देण्यासाठी शिक्षकांना सूचित केल्याचे सांगण्यात आले.
मागील दोन वर्षात महापुरामुळे अनेक शेतकऱयांची जनावरे वाहून गेल्याचे प्रकार घडले. परंतु त्यांना कोणतीच भरपाई मिळाली नाही. यासाठी पशुसंगोपन खात्याने अशावेळी शेतकऱयांची जनावरे पुरात वाहून गेल्यास नुकसानभरपाई देण्यासाठी क्रम हाती घ्यावेत, अशी सूचना आमदार निंबाळकर यांनी पशुसंगोपन खात्याच्या निरीक्षकांना दिली. संभाव्य पूरस्थिती निर्माण झाल्यास जनतेच्या सहकार्यासाठी व येणाऱया अडचणींवर मात करण्यासाठी सज्ज राहावे, अशी सक्त सूचनाही आमदारांनी अधिकारीवर्गाला केली. यावेळी सर्व खात्यांचे अधिकारी व नोडल अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रकाश उपस्थित होते.