ऑनलाईन टीम/तरुण भारत
राज्यात जाहीर झालेल्या ९२ नगरपालिका, ४ नगरपंचायत निवडणुकीचा जाहीर करण्यात आलेला कार्यक्रम स्थगित करण्यात आलाय. त्याबाबतची माहिती राज्य निवडणूक आयोगाचे (Maharashtra State Election Commission) अप्पर सचिव संजय सावंत यांनी आदेश काढून दिलीय. लवकरच त्याबाबत पुढील तारीख जाहीर करू, असंही सांगण्यात आलंय. ८ जुलै रोजी राज्यातील ९२ नगरपालिका आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. मात्र निवडणूका स्थगित करण्यात आल्यानंतर इच्छुक नाराज झालेत.
दरम्यान, राज्यातील १७ जिल्ह्यातील ९२ नगरपालिका व ४ नगरपंचायतींच्या निवडणुकींचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने नुकताच जाहीर केला होता. यांनतर सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुलीला विरोध केला होता. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक आयोगाने निवडणूक घेऊ नयेत अशी मागणी राजकीय पक्षांनी केली होती. आत निवडणूक आयोगाने या निवडणुकीला स्थगिती दिली आहे. यासंदर्भकात राज्य निवडणूक आयोगाचे अप्पर सचिव संजय सावंत यांनी परिपत्रक जरी केलं आहे. तसेच या निवडणुकीसंदर्भात लवकरच नवीन कार्यक्रम जाहीर केला जाईल असेही म्हंटले आहे.
राज्यात पुणे, सातारा, सांगली(Sangli), सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे (Dhule), नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड (Beed), उस्मानाबाद, लातूर (Latur), अमरावती आणि बुलढाणा या 17 जिल्ह्यातील 92 नगर परिषदा आणि चार नगरपंचायतीमध्ये निवडणुका होणार होत्या.
हा ही वाचा : आता सरपंच, नगराध्यक्षांची निवड होणार थेट जनतेतून
सांगली जिल्ह्याल ५ नगरपरिषदांच्या निवडणुका स्थगित
सांगली जिल्ह्याल विटा, इस्लामपूर, आष्टा, तासगाव, पलूस या नगरपालिकांच्या निवडणुका होणार होत्या. पण निवडणूक आयोगाच्या निर्णयाने या निवडणुकीला स्थगिती मिळाली आहे.
सातारा जिल्ह्याल ४ नगरपरिषदांच्या निवडणुका स्थगित
राज्यातील ९२ नगरपरिषदा व ४ नगरपंचायतींच्या निवडणुकांना राज्य निवडणूक आयोगाने स्थगिती दिली आहे. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयाने सातारा जिल्ह्यातील कराड, फलटण, वाई, म्हसवड, रहिमतपूर या नगरपंचायतींच्या निवडणुकांनाही स्थगिती मिळाली आहे.