बेळगाव : शिवाजीनगर येथील आरटीओ कार्यालयासमोर पडलेला खड्डा जीवघेणा ठरत आहे. खड्ड्यामध्ये पावसाचे पाणी भरल्यामुळे दुचाकीचालकांना खड्ड्याचा अंदाज येत नसल्यामुळे वारंवार अपघात होत आहेत. मुख्य मार्गावरच खड्डा पडल्याने रात्रीच्या वेळी तर अनेक अपघात होत असल्याने या ठिकाणी दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे. आरटीओ कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच पेव्हर्स खचल्याने खड्डा पडला आहे. सम्राट अशोक चौकातून वेगाने येणारी वाहने या खड्ड्यामध्ये अडकतात. उन्हाळ्यात खड्डा निदर्शनास येत असल्याने अपघात टाळता येतात. परंतु, पावसाचे पाणी साचल्यानंतर खड्डा निदर्शनास न आल्याने दुचाकीचालक जायबंदी होत आहेत. मुख्य मार्गावरच खड्डे पडल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
Previous Articleनानावाडी परिसरात डासांचा प्रादुर्भाव
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.