अभिनेते राहुल सोलापूरकर यांचे प्रतिपादन
► प्रतिनिधी/ बेळगाव
मूळ इतिहास बाजूला राहून त्याचे पुराण झाल्याने लोकांनीही ते पुराण म्हणूनच स्वीकारले. परंतु त्या मागचा खरा इतिहास समजून घेण्याचा कधी प्रयत्न केला नाही. यामुळे त्यावेळचा इतिहास आजच्या काळातही उपयोगी ठरू शकतो, हे लोकांना समजू शकले नाही. रामायणातील प्रभू राम हे आदर्श राज्यकर्त्याचे दर्शन घडवितात, असे प्रतिपादन अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी मांडले.
गुऊवर्य मो. ग. कुंटे यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त शनिवारी लोकमान्य रंग मंदिर येथे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राहुल सोलापूरकर यांनी ‘रामकृष्ण रिती, शिवाजी नीति, मोदी कृती’ या विषयावर आपले विचार मांडले. व्यासपीठावर चित्पावन ब्राह्मण संघाचे अध्यक्ष गोविंद फडके, कुंटे परिवारातील गणेश कुंटे उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, हिंदू धर्माला कोणीही संस्थापक नाही. हिंदू धर्म ही एक जीवन प्रणाली आहे. भगवद्गीतेतून कृष्णाने सांगितलेले विचार आजच्या जीवनातही महत्त्वाचे ठरतात. लक्ष्य मिळवताना मार्ग चुकल्यास लक्ष्य बदलण्याऐवजी त्याचा मार्ग बदलल्यास लक्ष्य मिळू शकते, हे श्रीकृष्णाने दाखवून दिले आहे. अज्ञानी लोक स्वत: काही करत नाहीत, परंतु ज्ञानी लोक मात्र विश्वाचा विचार करतात. प्रभू राम, श्रीकृष्णाचा विचार घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्य करीत असल्याचे कौतुक राहुल सोलापूरकर यांनी केले. कार्यक्रमाची सुऊवात दीपप्रज्वलनाने झाली. उपस्थित मान्यवर आणि कुंटे परिवारातील सदस्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्याचबरोबर मो. ग. कुंटे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक जगदीश कुंटे यांनी करून पुंटे सरांच्या आठवणींना उजाळा दिला. भालचंद्र कुंटे यांनी परिचय करून दिला. यावर्षी शिक्षक किरण हणमशेट यांना आदर्श शिक्षक म्हणून सन्मानित करण्यात आले. सरांचे विद्यार्थी सुनील आपटे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव कुंटे तर आभार राजश्री जोशी-कुंटे यांनी मानले.