शेतकऱयांना फटका : शुक्रवारी पहाटेही दमदार पाऊस, दुपारनंतर विश्रांती
प्रतिनिधी /बेळगाव
मान्सूनपूर्व पाऊस कोसळल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. बेळगाव परिसरात गुरुवारपासूनच दमदार पाऊस कोसळण्यास सुरुवात झाली. शुक्रवारी सकाळीही जोरदार पाऊस कोसळला. मान्सूनचे आगमन होण्यापूर्वी झालेल्या या पावसामुळे शेतीकामे पूर्णपणे ठप्प झाली असून शेतकऱयांना मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
यावषी वळीव पावसानेही अक्षरशः थैमान घातले होते. त्यानंतर समुदामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन काही राज्यांत पावसाने हाहाकार माजविला आहे. या वादळाचा परिणाम बेळगाव परिसरातही झाला. गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. गुरुवारी दुपारनंतर पावसाने शहरासह ग्रामीण भागाला झोडपले होते. रात्रभर संततधार पाऊस कोसळत होता. शुक्रवारी पहाटेपासूनही 11 वाजेपर्यंत पाऊस सुरूच होता. त्यामुळे शहरातील तसेच ग्रामीण भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते.
सध्या शाळांना सुरुवात झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही या पहिल्याच पावसाचा फटका बसला आहे. पाऊस कमी होणार की नाही, अशी भीती निर्माण झाली होती. मात्र शुक्रवारी दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतल्यानंतर काहिसा दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे शिवारात मात्र पाणी साचून राहिले होते. त्यामुळे आता शिवारामध्ये काम करणे कठीण जाणार आहे.
खरीप हंगामाची पेरणी खोळंबणार
खरीप हंगामाच्या पेरणीची तयारी शेतकरी करत आहेत. शिवारांमध्ये असलेली कामे आटोपून घेण्यासाठी धडपड सुरू आहे. मात्र या पावसामुळे व्यत्यय निर्माण झाला असून आता 15 दिवस तरी शेतामध्ये काम करणे अवघड जाणार आहे. यातच मान्सून सुरू झाला तर यावषीही खरीप हंगामाची पेरणी खोळंबणार अशी भीती व्यक्त होत आहे. एकूणच मान्सूनपूर्व पावसामुळे मोठा फटका बसण्याची चिंती व्यक्त होत आहे.
काही ठिकाणी झाडे कोसळली
गुरुवारपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली आहेत. तर काही ठिकाणी झाडांच्या फांद्यादेखील कोसळल्या. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला होता. भाग्यनगर, तिसरा क्रॉस येथे वॅगेनर कारवर झाड कोसळून कारचे नुकसान झाले आहेत. तर काही ठिकाणी झाडे कोसळून विद्युत ताराही तुटल्या होत्या.
अनेक ठिकाणी पाणी साचून
दमदार पाऊस कोसळत असल्यामुळे गटारी तुंडुंब भरून पाणी वाहत होते. काही ठिकाणी रस्त्यावरून पाणी वाहत होते. तर काही सखल भागामध्ये पाणी साचून होते. गटारी तुडुंब भरून रस्त्यावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहनचालकांना आणि पादचाऱयांना कसरत करावी लागली. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला होता. सुदैवाने शुक्रवारी पावसाने विश्रांती घेतल्याने हा धोका सध्या टळला आहे. विश्वेश्वरय्यानगर येथेही एक झाड कोसळले. त्यामुळे काही वेळ तो रस्ता बंद झाला होता. सुदैवाने यावेळी त्या ठिकाणी कोणीही नसल्याने जीवितहानी टळली आहे. मात्र यामुळे पथदीप खांबाचे नुकसान झाले आहे.
मुडलगी तालुक्यात पाच पूल पाण्याखाली : सतर्क राहण्याची पालकमंत्र्यांची सूचना
दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे एका मुडलगी तालुक्मयातील पाच पूल पाण्याखाली गेले आहेत. तर पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्याची सूचना प्रशासनाला केली आहे.
मुडलगी तालुक्मयातील सुणधोळ्ळी, कमलद्दीन्नी, अवरादी, हुनशाळ पी. वाय., ढवळेश्वर येथील पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. केवळ पाण्यामुळे ही स्थिती निर्माण झाली नाही तर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱयांमुळे हा धोका उद्भवल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
दोन दिवसांतील पाऊस लक्षात घेऊन घटप्रभा नदीवर बांधण्यात आलेल्या बॅरेजचे दरवाजे उघडायला हवे होते. पण ते न उघडल्यामुळेच पाच पूल पाण्याखाली गेल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसामुळे जिल्हय़ातील जनजीवनावरही परिणाम झाला आहे.
दरम्यान, पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी जिल्हाधिकाऱयांना पत्र पाठविले आहे. गुरुवार दि. 19 मे रोजी 10 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. आणखी तीन ते चार दिवस पावसाची शक्मयता आहे. त्यामुळे जनजीवनावर त्याचा परिणाम होऊ नये यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्याची सूचना पालकमंत्र्यांनी केली आहे. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना त्रास होवू नये यासाठी सर्व व्यवस्था करण्याची सूचनाही पालकमंत्र्यांनी केली आहे.