नगरसेवक तारक आरोलकर यांची माहिती
प्रतिनिधी /म्हापसा
म्हापसा नगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक 7 मध्ये डिसिल्टींग (गटारे) साफ करण्याचे काम चांगल्यापैकी झाले आहे हे खरे असले तरी आतापर्यंत फक्त 50 टक्केच काम पूर्ण झालेले आहे. पालिकेजवळ ट्रक नसल्याने आपल्या वार्डातील सर्व कामे अडकून पडली असल्याचा आरोप नगरसेवक तारक आरोलकर यांनी दै. तरुण भारतशी बोलताना केला.
गटारातील कचरा तसेच माती बाहेर काढून ठेवली आहे ती उचलणे अद्याप बाकी आहे. ट्रक नसल्याने हा गोंधळ निर्माण झाला आहे. कचरा ही समस्या जटील बनली असून आपल्या वॉर्डात सुमारे 14 ट्रक कचरा पडून असल्याची माहिती आरोलकर यांनी दिली. आपण अनेकदा नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर यांना याबाबत सांगितले असून त्यांनी सर्व कचरा उचलला जाईल असे आश्वासन दिले असले तरी अद्याप आश्वासनाची पूर्तता झालेली नाही असा आरोप त्यांनी केला. आपल्या वॉर्डात सुलभ शौचालय होता त्याचा स्लॅब कोसळला आहे. याबाबत आपण नगराध्यक्ष, मुख्याधिकाऱयांना माहिती दिली आहे. कंत्राटदाराला कळविण्यात आले असून सध्या तो शौचालय बंद ठेवण्यात आला आहे. येथे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे, येथे त्वरित दुरुस्ती करणे काळाची गरज आहे.
पालिकेकडे ट्रक आहे मात्र ते ब्रेकडाऊन झाले आहे. फक्त दोन ट्रक कार्यरत आहेत. प्रभारी नगराध्यक्ष शेखर बेनकर यांनी आपण प्रभागात जाऊन ट्रक दुरुस्त करून कचरा घरोघरी जाऊन कामगार गोळा करणार असे स्पष्ट केले आहे तेही या ट्रकाची वाट पाहत आहे अशी माहिती आरोलकर यांनी दिली.
आमदाराचे चांगले सहकार्य मिळते
आमदाराचे आम्हाला चांगले सहकार्य मिळते. सध्या मान्सूनपूर्व कामे सुरू आहेत. आपल्या वॉर्डात भूमिगत वीज वाहिन्या घालण्याचे काम बाकी आहे. मलःनिस्सारण प्रकल्पाचे कामही बाकी आहे. या कामासाठी प्रत्येक नागरिकांनी सहकार्य करणे आवश्यक असल्याची माहिती त्यांनी दिली. जी कामे मान्सूनपूर्व राहिली आहे तरी त्वरित होणे गरजेचे आहे. तार घर ते बडीगर घर, म्हापसा जिल्हा आझिलो, राष्ट्रोळी ते सातींगण देवस्थान कामे बाकी राहिली आहेत. प्रभू इस्टेट भानूदास देसाई येथील कामे राहिली आहे. येथे जो कचरा काही ठिकाणी काढून वर ठेवला आहे तो पावसापूर्वी उचलणे गरजेचे आहे अशी माहिती नगरसेवक आरोलकर यांनी दिली. पाऊस जवळ आला तरी ही कामे कशी त्वरित पूर्ण करता येईल हेच तर आमचे आव्हान असून ती पूर्णत्वाकडे नेणे काळाची गरज आहे अशी माहिती त्यांनी दिली.
वाढत्या गुह्याकडे सरकारने लक्ष द्यावे
राज्यात चोऱया मोठय़ा प्रमाणात होत असल्या तरी बेरोजगारी हे या मागचे कारण आहे. पोलिसांनी व स्थानिकांनी यावर ट्रेक ठेवणे काळाची गरज आहे. म्हापसा पोलिसांनी गुन्हेगार चोरटय़ांना पकडण्यास महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सरकारने याकडे लक्ष द्यावे असे ते म्हणाले.
पेडे येथे सिग्नल बसविल्यावर अपघात टळेल
आपल्या वॉर्डात पेडे म्हापसा येथे मोठय़ा प्रमाणात अपघात होत असून येथे सिग्नल बसवावे असा ठराव म्हापसा पालिकेने एकमुखाने घेतला आहे. व येथे सीआयएसतर्फे कंपनी पाहिली आहे. जिल्हा आझिलोकडे येण्यास सध्या वाट काढलेली आहे. सिग्नल आलेले आहे ते येणाऱया काळात घातल्यावर येथे अपघाताची मालिका बंद होईल अशी माहिती त्यांनी दिली.