२९ जानेवारी रोजी एकदिवशीय सेमिनार; सकाळी ८ ते सायंकाळी ६ पर्यंत अनेक तज्ञांचे मार्गदर्शन
कोल्हापूर/प्रतिनिधी
इयत्ता दहावीमध्ये ८० ते ९ ० टक्केपर्यंत गुण संपादन करणाऱ्या गरीब , गरजू व हुशार विद्यार्थ्यांचे अर्थिक अडचणीमुळे पुढील शिक्षण थांबू नये यासाठी ‘ प्रेमसाई चॅरिटेबल ट्रस्ट’कडून त्यांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदत केली जात आहे . ट्रस्टच्या २०१७ च्या स्थापनेपासून आजतागायत १२७ गरीब व होतकरु विद्यार्थ्यांचे पालकत्व स्विकारले आहे . विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास त्यांची शैक्षणिक वाटचाल सुकर होते . हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ट्रस्टच्यावतीने रविवार २ ९ जानेवारी रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेळेत एकदिवशीय सेमिनार आयोजित केले आहे .
शिवाजी उद्यमनगर येथील कोल्हापूर इंजिनिअरिंग असो , च्या हॉलमध्ये होणाऱ्या या सेमिनारमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर मार्गदर्शन करणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र मांगलेकर यांनी पत्रकार बैठकीत दिली . अध्यक्ष मांगलेकर म्हणाले , ट्रस्टने मदतीचा हात दिल्यामुळे २०१७ पासून आजतागायत अनेक विद्यार्थी एमबीबीएससह अन्य उच्च शिक्षणाच्या पदव्या घेत आहेत . हे विद्यार्थी नोकरी अथवा व्यवसाय करू लागल्यानंतर त्यांनी सामाजिक जाणिवेतून आपल्या जिल्ह्यातील गरीब विद्यार्थ्यांना मदतीचा हातभार द्यावा अशी ट्रस्टच्या सर्व विश्वस्थांची अपेक्षा आहे .
रविवारी होणाऱ्या एकदिवशीय सेमिनारमध्ये सकाळी ८ ते ९ .३० पर्यंत रजिस्ट्रेशन होईल . त्यानंतर ‘ होय मला जिंकायचयं ‘ या विषयावर एज्युकेशनल अॅडव्हायझर सदाशिव पांचाळ यांचे मार्गदर्शन होणार आहे . औरंगाबादचे आयकर उपायुक्त विष्णू औटी यांचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व आव्हान ‘ या विषयावर मार्गदर्शन करतील . माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी ग्रामीण विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षा या विषयावर विद्यार्थ्यांना संबोधित करणार आहेत . दुपारी ३ ते ३.४५ वाजता ‘ विद्यार्थी आणि भावनिक बुध्यांक ‘ या विषयावर उद्योजक निलेश कावडे मार्गदर्शन करतील . ३.४५ ते ४.३० वाजता ‘ भौतिक शिक्षण व अध्यात्म ‘ या विषयावर ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र मांगलेकर विद्यार्थी व पालकांना माहिती देतील . त्यानंतर ट्रस्टचे विश्वस्थ उदय पाटील ‘ शासकीय सेवेतून ● देशसेवा ‘ या विषयावर संबोधित करतील . उपस्थित विद्यार्थ्यांनाही मनोगत करण्याची संधी दिली जाणार असल्याचे मांगलेकर यांनी स्पष्ट केले . पत्रकार बैठकीस ट्रस्टचे खजानीस महिपती पाटील , विश्वस्थ रविंद्र तुळसवडे आदी उपस्थित होते .