नवी दिल्ली / वृत्तसंस्था
ब्रिटनच्या दिवंगत महाराणी एलिझाबेथ (दुसऱया) यांच्या अंत्यविधीसाठी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित राहणार आहेत, असे केंद सरकारने स्पष्ट केले आहे. हा अंत्यविधी 17 सप्टेंबरला होणार आहे. महाराणींचा देहांत 9 सप्टेंबरला झाला होता. राष्ट्रपती मुर्मू 17 सप्टेंबरला लंडनला जाणार आहेत.
मंगळवारी महाराणींचे पार्थिव लंडन येथील ऐतिहासिक बकिंगहॅम राजवाडय़ात शवपेटिकेतून आणण्यात आले. तेथे ते दिवसभर दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. बुधवारी ते अंत्यविधीसाठी वेस्टमिनिस्टर सभागृहात आणण्यात आले. तेथेच येत्या सोमवारी अंत्यसंस्कार होणार आहेत. बकिंगहॅम राजवाडय़ापासून वेस्टमिनिस्टर सभागृहापर्यंत पार्थिव मिरवणुकीने आणण्यात आले. आपल्या लाडक्या महाराणींच्या या अखेरच्या प्रवासात लक्षावधी ब्रिटीश नागरीक साश्रू नयनांनी समाविष्ट झाले होते. मिरवणूक वेस्टमिनिस्टर सभागृहात आल्यानंतर मानवंदना देण्यात आली.
चोवीस तासांची रांग महाराणींचे पार्थिव बकिंगहॅम राजवाडय़ात अंत्यदर्शनासाठी आणण्यात आल्यानंतर लक्षावधी ब्रिटीश नागरीकांनी पार्थिवाचे दर्शन घेतले. दर्शनासाठीची रांग 24 तासांहून अधिक काळ लागलेली होती. यावेळी लंडनमध्ये जोरदार पाऊस होता. तरीही पावसाची तमा न बागळता नागरीक रांगेत उभे होते. महाराणी एलिझाबेथ (दुसऱया) यांनी ब्रिटनवर 70 वर्षे राज्य केले. त्या ब्रिटनच्या सर्वाधिक काळ सत्ताधीश असणाऱया महाराणी होत्या. भारतातही त्यांना मानवंदना देण्यासाठी राष्ट्रीय दुखवटा घोषित करण्यात आला होता. 19 सप्टेंबरला होणाऱया त्यांच्या अंत्यविधीसाठी जगभरातील सर्वोच्च नेते उपस्थित राहणार आहेत.