शिवप्रेमींतून नाराजी ः विरोध केल्यास संघटितपणे लढा देण्याचा इशारा
प्रतिनिधी/ बेळगाव
राजहंसगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात येत आहे. सुळगे-येळ्ळूर ग्राम पंचायतमध्ये पुतळा बसविण्याचा ठराव बहुमताने संमत झाला आहे. त्यामुळे ग्राम पंचायतीच्या पीडीओंनीदेखील मंजुरी दिली. मात्र आता काही दिवसांपूर्वी ग्राम पंचायत पीडीओंवर वरि÷ अधिकारी आणि पोलीस अधिकारी दबाव घालून ‘तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यास मंजुरी कशी दिली?’ असे म्हणून त्यांच्यावर दबावतंत्र वापरण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे शिवभक्तांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
राजहंसगड किंवा इतर कोणत्याही गडावर छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराजांचा पुतळा असतोच आणि नसेल तर त्याठिकाणी पुतळा प्रतिष्ठापना केला जातो. या दोघांही राजांनी एक वेगळा इतिहास निर्माण केला आहे. राजहंसगडाचा विकास करण्याचे काम हाती घेण्यात आले. त्यानंतर त्याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. असे असताना आता दबावतंत्र घालण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. यामुळे संताप व्यक्त होत आहे.
काही मूठभर लोकांमुळे बेळगाव शहर व तालुक्मयामध्ये वितुष्ट निर्माण होत आहे. यापूर्वी बऱयाच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याचा प्रकार घडला आहे. सध्या सत्तेमध्ये भाजपचे सरकार आहे. मात्र याच काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होण्याच्या सर्वात जास्त घटना घडल्या आहेत. निवडणूक समोर आल्यानंतर मात्र महाराजांची आठवण होते. आता काहीजण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीदेखील वाटप करत आहेत. त्याच व्यक्ती अवमान झाल्यानंतर मात्र मूग गिळून गप्प बसत आहेत, अशी चर्चादेखील सध्या रंगली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास प्रथम समजून घेणे गरजेचे आहे. त्यांच्यामुळेच हिंदूराष्ट्र निर्माण झाले आहे. त्यांनी कधीच जातीभेद, भाषाभेद केला नाही. महाराष्ट्रासह कर्नाटकातही त्यांनी लढाया केल्या आहेत. याचा अभ्यास विरोध करणाऱयांनी करावा. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज हे कोण होते, हे समजेल. अशा तीव्र प्रतिक्रियादेखील आता उमटू लागल्या आहेत.
बहुमताने ठराव संमत
काही दिवसांपूर्वी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाचे पोलीस अधिकारी आणि पोलीस राजहंसगडावर दाखल झाले. याचबरोबर जिल्हा पंचायतीचे अधिकारीही त्याठिकाणी आले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यास मंजुरी का दिली? म्हणत पीडीओ व इतर अधिकाऱयांवर दबाव घालण्याचा प्रयत्न सुरू झाला. मात्र पीडीओ व ग्राम पंचायतीच्या कर्मचाऱयांनी बहुमताने ठराव संमत झालेला आहे. त्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही, असे सांगितले. त्यामुळे पोलीस व इतर अधिकाऱयांची बोलती बंद झाली.
दबाव कोणी घातला व कशासाठी?
हा प्रकार घडल्यानंतर याची माहिती लोकप्रतिनिधींना मिळाली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याठिकाणी अधिकाऱयांना चांगलेच धारेवर धरले, त्यावर आमच्यावर दबाव येत आहे, असे अधिकाऱयांनी सांगितले. तुमच्यावर कोण दबाव घालत आहे? असे विचारले असता त्यांनी काहीच सांगितले नाही. त्यामुळे नेमका हा दबाव कोणी घातला व कशासाठी? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. राजहंसगड परिसरात यापूर्वीही काही मूठभर कन्नड दुराभिमान्यांनी धिंगाणा घालण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे संताप व्यक्त झाला होता. पुन्हा अशा प्रकारे दबाव घातल्यामुळे तीव्र संताप व्यक्त होऊ लागला आहे. जर कोणीही विरोध केला तर आता संघटितपणे लढा देण्याचाही निर्धार शिवप्रेमींनी केला आहे.