हरित वृद्धी, स्वच्छ उर्जा, शाश्वत जीवनशैली आणि जगाच्या कल्याणासाठी भारत प्रयत्नशील आहे. त्याला जी-७ देशांनी साथ द्यावी, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले आहे. जर्मनीत येथे हवामान ऊर्जा आणि आरोग्य या विषयावर चर्चासत्रात आयोजित करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.
स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञानासाठी भारतात मोठी बाजारपेठ विकसित होत आहे. या क्षेत्रात संशोधन, नवोन्मेष आणि कारखानदारीमधे जी-७ देशांनी गुंतवणूक करावी. तसेच नव्या कल्पना इतर विकसनशील देशांमधे पोचवण्यासाठी भारताला सहकार्य करावे, असं आवाहन मोदी यांनी यावेळी केले.