प्रतिनिधी /म्हापसा
हानी झालेल्या बंधाऱयामुळे शेतात पाणी घुसते आणि शेतकऱयांना दरवर्षी विविध समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे पावसाळय़ापूर्वी बंधाऱयांची दुरुस्ती करण्यासाठी संबंधित अभियंत्यांकडून अंदाजपत्रक तयार केले जाईल असे हळदोणचे आमदार ऍड. कार्लुस फरेरा यांनी सांगितले.
आमदार फरेरा यांनी कृषी आणि जलस्त्रोत विभागाच्या अधिकाऱयांसह पुनोळा, कालवी, खोर्जुवे, मयडे येथील बंधारे आणि जलस्त्रोतांची पाहणी केल्यावर ते बोलत होते. स्थानिक शेतकऱयांना भेडसावणाऱया समस्यांच्या अनुषंगाने त्यांनी मतदारसंघातील विविध भागांना भेटी दिल्या होत्या. यासंदर्भात बोलताना आमदार फरेरा म्हणाले की, बंधाऱयांचे हाम हाती घेणे हे शेतकऱयांच्या हिताचे आहे. अनेक उत्साही शेतकरी स्वतःच्या शेतात पीक घेण्यासाठी पुढे येत आहेत मात्र बंधारे फुटल्यामुळे त्या सर्व शेतकऱयांवर संकट ओढवले आहे. त्यामुळे शेतकऱयांना सरकारच्या सहकार्याची गरज आहे. शेतकऱयांना शेतीसाठी प्रोत्साहित करण्याला आपण प्राधान्य देणार आहे असेही फरेरा म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, खोर्जुवे येथील काही घरांमध्ये पाणी शिरते आणि त्या समस्येचे निवारण करण्यासाठी रखडलेल्या निविदेला पुन्हा चालना दिली जाईल. काही ठिकाणी बंधाऱयांची फाटके काढण्यात आली असून त्यामुळे शेतजमिनीत पाणी शिरून शेतकऱयांना नुकसान होते. तसेच विहिरींचे पाणीही खारट झाले आहे. यासंदर्भात उपाययोजना हाती घेतली जाईल असे आमदार फरेरा यांनी सांगितले.