वृत्तसंस्था/ गौहत्ती
आसाम आणि मुंबई यांच्यातील मंगळवारपासून येथे सुरू झालेल्या रणजी स्पर्धेच्या इलाईट ब गटातील सामन्यात खेळाच्या पहिल्या दिवशी मुंबईने पहिल्या डावात 2 बाद 397 धावा झळकवल्या. सलामीचा फलंदाज पृथ्वी शॉने नाबाद द्विशतक (240) झळकवले.
या सामन्यात पृथ्वी शॉने चौफेर फटकेबाजी करत संपूर्ण दिवसभरात 283 चेंडूत 1 षटकार आणि 33 चौकारासह 240 धावा जमवल्या. त्याने मुशीर खानसमवेत सलामीच्या गडय़ासाठी 123 धावांची तर त्यानंतर अरमान जाफरसमवेत दुसऱया गडय़ासाठी 74 धावांची भागीदारी केली. पृथ्वी शॉ आणि कर्णधार रहाणे यांनी तिसऱया गडय़ासाठी अभेद्य 200 धावांची भागीदारी केली आहे. मुशीर खानने 1 षटकार आणि 5 चौकारासह 42 तर जाफरने 4 चौकारासह 27 धावा जमवल्या. कर्णधार रहाणे 5 चौकारासह 73 धावावर खेळत आहेत. आसामतर्फे मुक्तार हुसेनने एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक- मुंबई प. डाव 90 षटकात 2 बाद 397 (पृथ्वी शॉ खेळत आहे 240, रहाणे खेळत आहे 73, मुशीर खान 42, अरमान जाफर 27).