भारत जोडो यात्रेत सहभागी होता येणार नाही
नवी दिल्ली :
काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी प्रकृती अस्वास्थ्यामुळे भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होऊ शकणार नाहीत. प्रकृती बिघडल्यामुळे त्या सध्या उपचार घेत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी शुक्रवारी याबाबतची माहिती दिली असून तब्येत सुधारताच भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होणार असल्याचे सांगितले आहे. प्रियांका गांधी यांना शुक्रवारीच उत्तर प्रदेशातील चांदौली येथे भारत जोडो यात्रेत सहभागी व्हायचे होते. मात्र, त्यांना सहभागी होता येत नसल्याबाबत त्यांनी ‘एक्स’च्या माध्यमातून कार्यकर्त्यांप्रती दिलगिरी व्यक्त केली आहे. 16-21 फेब्रुवारी दरम्यान भारत जोडो न्याय यात्रा पूर्व उत्तर प्रदेशातील काही जिल्ह्यांमध्ये आणि नंतर रायबरेली आणि अमेठीमध्ये पोहोचणार आहे. 22 आणि 23 फेब्रुवारी हे प्रवासासाठी विश्र्रांतीचे दिवस आहेत. त्यानंतर 24 आणि 25 फेब्रुवारी रोजी पश्चिम उत्तर प्रदेशातून यात्रा पुढे प्रवास करेल.