कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जयंत पाटील यांनी वेदांता प्रकल्प राज्याबाहेर जाणे हे दुर्देव असून तेयामुळे महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले असल्याचे म्हटले आहे.
पत्रकारांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले,”वेदांता महाराष्ट्रात यावा यासाठी महाविकास आघाडीचे प्रयत्न केले होते. मुख्यमंत्री झाल्यानंतरच्या भाषणातही एकनाथ शिंदे यांनी वेदांताचा उल्लेख केला होता. पण वेदांता महाराष्ट्राबाहेर गेला हा प्रचंड मोठा लॉस आहे. आता त्याच्या बदल्यात अमक देतो तमक देतो असली गाजर दाखवू नका..मुख्य गुंतवणूकच महाराष्ट्रातून गेली आहेत..येणारे प्रकल्प मर्यादित आहेत. मागील वीस दिवसात असं काय झालं की हा प्रकल्प महाराष्ट्र सोडून गेला. असं पहिल्यांदा घडतय प्रकल्प आणणारा उद्योजक ट्वीट करून स्पष्टीकरण देतोय. म्हणजे त्यांना जे सांगितले गेले त्याप्रमाणे ते बोलतात.” अशी त्यांनी प्रतिक्रिया त्यांनी दिली. ते म्हणाले, “हा प्रकल्प पुन्हा राज्यात आणण्यासाठी आम्ही एकनाथ शिंदे यांना सहकार्य करू. त्यांनी पुढाकार घ्यावा. गुजरात मधील युवकांना काहीतरी सांगण्यासाठी हा प्रकल्प तिकडे नेला असावा.”
पुढे बोलताना ते म्हणाले, “चांगली एफआरपी मिळाली पाहिजे. पण सर्व खर्च धरून त्याची रक्कम ठरवली पाहिजे. एफआरपीचे तुकडे कोणी केले, यापेक्षा जास्तीत जास्त कारखान्यांनी एफआरपी दिली आहे हे सुद्धा पाहिले पाहिजे”. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांसंबंधी महाविकास आघाडीची भुमिकेवर विचारले असता ते म्हणाले ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे तिथे महाविकास आघाडीने एकत्र निवडणुका लढवल्या पाहिजेत
सांगलीमध्ये साधूंना झालेल्या मारहाणीवर प्रतिक्रिया देताना, “हिंदुत्वसाठी सरकार पडणाऱ्यांच्या काळात आता साधूंवर हल्ले होऊ लागले हे दुर्दैव आहे.” अशी प्रतिक्रिया दिली.