ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर-युवा संघटनेच्या अध्यक्षांना ग्रामस्थांचे निवदेन
वार्ताहर /उचगाव
उचगाव ग्रामस्थांची सर्वाधिक शेती ही गावच्या पूर्व दिशेला तलावाच्या परिसरात आहे. या तलावातील पाणी मण्णूरच्या दिशेने जाणाऱया रस्त्याच्या बाजूने नेऊन शेतीसाठी उपयोग केला जातो. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुर्दशा झाल्याने या रस्त्यावरून चालणे देखील मुश्कील झाले आहे.
सदर रस्ता दुरुस्तीसाठी माजी एपीएमसी अध्यक्ष युवराज कदम, माजी ग्रा. पं. सदस्य सुनील देसाई, सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटील, शेतकरी संघटनेचे प्रमुख बबलू चौगुले याबरोबरच या भागातील शेतकऱयांनी मोठय़ा प्रमाणात उपस्थित राहून निवेदन दिले. यावेळी लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सदर रस्त्याचे तातडीने खडीकरण करून उन्हाळय़ात डांबरीकरण करून देण्याचे आश्वासन दिले.
शेतवडीतील जनावरांचा चारा आणणे, शेतवाडीत ये-जा करण्यासाठी व अवजारे ने-आण करण्यासाठी सदर रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र पावसाळय़ात गुडघाभर चिखल आणि उन्हाळय़ात धुळीने हा रस्ता माखलेला असल्याने शेतकऱयांची मोठी गैरसोय होत आहे. यासाठी तातडीने सदर रस्त्यावर दगड, खडी घालून तात्पुरता कच्चा रस्ता करावा आणि उन्हाळय़ामध्ये सिमेंट काँक्रीट अथवा डांबरीकरण करून, उचगाव-मण्णूर हा अप्रोच रोड तयार करावा, अशा आशयाचे निवेदन ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर तसेच युवा संघटनेचे अध्यक्ष मृणाल हेब्बाळकर यांना देण्यात आले.