प्रतिनिधी/ पणजी
समाजसेवक तथा उद्योजक मुन्नालाल हलवाई यांच्यावर पत्रकार परिषेदत झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी येथील आझाद मैदानावर मोर्चा काढण्यात आला. हल्लेखोरांवर त्वरित कारवाई करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. पत्रकार परिषद सुरु असताना हल्ला होतो, याचाच अर्थ राज्यात गुन्हेगार किती माजले आहेत, याचा प्रत्यय येतो. तसेच राज्यातील कायदा सुव्यवस्था कोलमोडल्याचे दिसून येते. असले प्रकार खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही मोर्चात देण्यात आला.
काल शनिवारी सकाळी 10 ते 11 दरम्यान येथील आझाद मैदानावर निषेध मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी जॉन नाझारेत, शंकर पोळजी, महेश नाईक, इफ्तीहाज शेख, मुन्नालाल हलवाई, तारा केरकर व अन्य 20 लोक उपस्थित होते.
यावेळी पत्रकारांशी बोलताना मुन्नालाल हलवाई यांनी भाजवर टीका केली. आपल्यावर झालेला हल्ला हा लोटलीकर यांनी केला आहे. लोटलीकर यांचे लागेबांधे भाजपच्या नेत्यांशी आहेत, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ केली जाते, असा आरोप त्यांनी केला. भर पत्रकार परिषदेत आपल्यावर हल्ला झाला होतो तोंडाला काळ्या रंगाचा स्प्रे मारण्याचा प्रयत्न केला जातो ही घटना घडत असताना पत्रकार तसेच अनेक लोक उपस्थित होते. व्हिडीओ पॅमेरामध्ये संशयिताचा चेहरा स्पष्ट दिसतो. मात्र त्याच्यावर कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न उपस्थित केला. राज्यातील कायदा सुव्यवस्था कोलमोडली आहे. भाजप नेते आमदारांना विकत घेऊन सरकार टिकविण्यात मग्न असून त्यांना सर्वसामान्य जनतेचे काहीच पडलेले नाही. हल्लेखोरावर त्वरित कारवाई करून आपल्याला न्याय मिळावी, अशी मागणीही मुन्नालाल यांनी केली आहे.