वार्ताहर /खानापूर
राजस्थानमधील उदयपूर येथे कन्हैयालाल तेली या युवकाचा गळा चिरून हत्या केल्याच्या निषेधार्थ मोर्चा काढून त्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन खानापूर तालुक्मयातील विविध हिंदू संघटनांच्यावतीने शुक्रवारी खानापूर तहसीलदाराना देण्यात आले
यासंदर्भात खानापुरातील शिवस्मारक चौकामध्ये हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी राजस्थान सरकारच्या विरोधात व हत्या केलेल्या त्या आरोपींच्या विरोधात घोषणा देत सदर युवकाला न्याय मिळवून द्यावा व त्यांच्या कुटुंबाला संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी या मोर्चाद्वारे करण्यात आली
भाजपा युवा नेते पंडित ओगले यांनी या मोर्चाचे नेतृत्व करत तहसीलदार प्रवीण जैन यांच्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पंडित ओगले, बजरंग दलचे तालुकाध्यक्ष नंदकुमार निट्ठूरकर आदांनी आपले विचार मांडून राजस्थान सरकारचा निषेध केला व त्या हिंदू युवकाला न्याय मिळवून देण्याची मागणी केली.
यावेळी जि. पं. माजी सदस्य ज्योतिबा रेमाणी, जयंत तिनईकर, भाजपचे बाळू सावंत, आकाश अथणीकर, बसवराज सानिकोप, युवा मोर्चा अध्यक्ष दशरथ किल्लारी, महेश गुरव, लोंढा ग्राम पंचायतीचे माजी चेअरमन रमेश शिंगनाथ, किरण तुडवेकर, संजय मयेकर, ज्ञानेश्वर देवलतकर, पंकज कुटे, संजय सावंत, मारुती जाधव, संदीप शेमले, जांबोटी, लोंढा, कक्केरी, पारिश्वाड, गर्लगुंजी, नेरसा, खानापूर भागातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.