वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सार्वजनिक क्षेत्रातील बँका वित्तीय समावेशन अभियानांतर्गत डिसेंबर 2022 पर्यंत बँकिंग सेवा अद्याप पोहोचलेल्या नाहीत अशा विविध राज्यांतील ग्रामीण भागात सुमारे 300 शाखा उघडणार असल्याची माहिती आहे.
ज्या गावांची लोकसंख्या 3,000 पेक्षा जास्त आहे अशा सर्व गावांमध्ये आगामी या नवीन शाखा उघडल्या जातील. राजस्थानमध्ये जास्तीत जास्त 95 शाखा आणि मध्य प्रदेशात 54 शाखा उघडल्या जातील असे सांगितले जाते.
यासोबतवच सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या गुजरातमध्ये 38, महाराष्ट्रात 33, झारखंडमध्ये 32 आणि उत्तर प्रदेशमध्ये 31 शाखा उघडल्या जाणार आहेत. बँक ऑफ बडोदा 76 शाखा उघडणार असून स्टेट बँक ऑफ इंडिया या भागात 60 शाखा उघडणार आहे.