स्वराज्य संघटनेची घोषणा
ऑनलाईन टीम/तरुण भारत
राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढणार असल्याची घोषणा संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. यासाठी मला सर्व पक्षांनी पाठिंबा द्यावा असे आवाहनही त्यांनी केले आहे. तसेच आपण भाजपमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये जाणार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. संभाजीराजेंनी स्वराज्य या संघटनेची घोषणा केली आहे. सगळ्या मराठा समाजला एका छताखाली आणण्यासाठी ही संघटना स्थापन केली असे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले आहे. ते पुणे येथे आज पत्रकार परिषदेत बोलत होते.
खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या खासदारकीचा कार्यकाळ संपला आहे. आता पुढील राजकीय वाटचाल काय असेल यावर त्यांनी भाष्य केलं आहे. विकासकामं करण्यासाठी राजसत्ता हवी असते असं ते म्हणाले आहे. यावेळी राज्यसभेची निवडणूक लढवणार असल्याचं ते म्हणाले. तसेच अपक्ष म्हणून लढणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं आहे.
माझा अधिकार बनतो की, आपण अपक्ष म्हणून मला पाठिंबा देण्याची गरजेचे आहे. जे २९ आमदार आहेत. त्यात छोटे मोठे पक्ष आहेत. तुम्ही मोठे मन दाखवून माझ कार्य पाहून मला पाठिंबा द्यावा. मला विश्वास आहे की तुम्ही सर्वजण मला पाठिंबा द्याल. एक व्यक्ती राजकारण विरहीत काम करु शकते तर आपण राज्यसभेवर पाठवू शकता, असे संभाजीराजे म्हणाले.
कोणतही काम करताना मी राजकीय फायदा पाहिला नाही. मी जेव्हा पाठींबा दिला तेव्हा लोकहिताच्या मुद्द्यावर पाठींबा दिला आहे. समाजासाठी शाहूंचा वंशज म्हणून बाहेर पडलो आहे. आज तुमची वेळ आली आहे. माझा कार्यकाळ संपला असल्यामुळे माझ्या योगदानाची दखल घेऊन राज्यसभेवर पाठवाव, आणि सर्व पक्षीय नेत्यांना माझी विनंती आहे आणि तुम्ही मला पाठवाल असा विश्वास आहे. मी कोणत्या पक्षाचा सदस्य नाही. अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहे.
संभाजीराजे यांनी दुसऱ्या निर्णयामध्ये एका नव्या संघटनेची घोषणा केली आहे. ”मला वेगवेगळ्या संघटनांचे, पक्षांचे लोक पाठिंबा देतात. ही छत्रपती घराण्याची ताकद आहे. मला चांगले-वाईट अनुभव देखील आले. या जनतेला एका छताखाली कसं आणता येईल, हा माझा प्रामाणिक प्रयत्न नेहमीच राहिला आहे. त्यामुळे मी दुसरा निर्णय असा घेतला आहे की छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या विचारांना मानणाऱ्या सगळ्यांना संघटित करण्यासाठी, समाजाला दिशा देण्यासाठी, सगळ्यांच्या कल्याणासाठी मी आणि आम्ही सर्वजण एक संघटना स्थापन करणार आहोत. त्या संघटनेचं नाव आहे स्वराज्य. यासाठी मी याच महिन्यात राज्याचा दौरा करणार आहे. लोकांच्या भावना समजून घेण्यासाठी हा दौरा करणार आहे. आजपासून ही संघटना स्थापन झाली आहे”, असं संभाजीराजे यांनी जाहीर केलं आहे.