भगवंत म्हणाले, गुरुमुखाने शास्त्रशुद्ध श्रवण केल्याने जे प्राप्त होते, त्याला ‘ज्ञान’ म्हणतात आणि त्याचा जो प्रत्यक्षानुभव त्याला ‘विज्ञान’
म्हणतात.
सद्गुरूंकडून मिळवलेल्या ज्ञानाच्या परमानंदाची चव प्रत्यक्ष अनुभूती घेतल्याशिवाय कळत नाही. थोडक्मयात सांगायचं म्हणजे माझ्या सर्वोत्तमपदाची प्राप्ती होण्याला ज्ञानविज्ञान हीच संपत्ती कारणीभूत आहे. ह्यायोगे जे माझे वास्तविक स्वरूप जाणतात, त्यांच्याबद्दल मला अनन्य प्रीती वाटते. ज्ञानाच्या एका अंशानेसुद्धा जी सिद्धी मिळू शकते, ती तपश्चर्या, तीर्थयात्रा, जपजाप्य, दान किंवा अन्य कोणत्याही पवित्र क्रियांनी पूर्णपणे मिळत
नाही.
अशा त्या शुद्ध ज्ञानाचा महिमा ऐक.
पंचाग्नि साधून तप किंवा गंगात्रिवेणी आदिकरून तीर्थयात्रा, अनेक मंत्रांचा जप किंवा गो, भूमि, तिळ, सुवर्ण इत्यादि दाने किंवा आणखीही इतर जे पवित्र स्वधर्मकर्मादि आचार, योग, अग्निहोत्रे, नानाप्रकारचे यज्ञ वा अशा प्रकारची अत्यंत शुद्ध व पावन करणारी कृत्ये, तपादिक साधने यातून होणारी शुद्धी मोठी आहे हे खरे पण त्यांचा पवित्रपणा ज्ञानाच्या एका अंशालाही तुळणार नाही. अर्धक्षणाच्या ज्ञाननि÷sने जी पवित्रता प्राप्त होते, ती तपादि नानासाधनांनी कल्पांतीसुद्धा प्राप्त व्हावयाची नाही. असे जे पवित्र ज्ञान, तेच मुख्यत्वे धारण करून माझे भजन करावे. ज्ञानाचे महत्व मी तुला सविस्तर एव्हढय़ाचसाठी सांगितले की, तू ज्ञानासहित आत्मस्वरूपाला जाणून घ्यावेस आणि नंतर ज्ञानविज्ञानाने संपन्न होऊन भक्तिभावाने माझे भजन करावेस. ज्ञानाच्या पवित्र प्रवाहामध्ये, जीवाभावाला पुनीत करावे. असे केल्याने जीव हा परमात्मस्वरूपच आहे हे लक्षात येईल.
जीव आणि परमात्मा दोन्ही एकच आहेत असे जाणणे हे ज्ञान होय आणि ऐक्मयभावनेने परमात्मसुख भोगणे ह्याचे नाव विज्ञान होय. अशा रीतीने जो ज्ञानविज्ञानसंपन्न होतो तो माझ्याशी एकरूप होतो अशी एकरूपता साधल्यावर माझे भजन करावे. उद्धवा ! ह्या भजनाचा परिणाम कसा होतो ते ऐक. तो जिथं जिथं पाहतो, त्या त्या ठिकाणी त्याला माझ्याशिवाय दुसरे काही दिसतच नाही. मग तो त्या त्या ठिकाणी मला अनन्य भावानेच भजू लागतो. अशा माझ्या भजनामध्ये अहोरात्रात खंड पडत नाही. जागृतीत, स्वप्नात किंवा सुषुप्तीतसुद्धा माझ्या भजनात खळ म्हणून नाहीच. समजा मला विसरून तो एखाद्या ठिकाणी गेला तर तो जेथे जातो, तेथेही तो मलाच पाहतो. ह्याप्रमाणे विस्मरणालाच मरण येते नव्हे, स्मरणसुद्धा नाहीसे होऊन जाते. अशा प्रकारे ज्ञानविज्ञानसंपन्न लोक असतात त्यांना माझ्याशिवाय दुसरे काही दिसतच नाही.
अशाप्रकारे माझे अनन्य भजन करणे ह्याचेच नांव ‘शुद्धभक्ती’ हे लक्षात ठेव. पूर्वी मोठमोठाले मुनिवर्य ह्याच रीतीने माझी एकनि÷ भक्ती करून मला पावले. मी सर्वांच्याच अंतःकरणात वास करून असतो हे लक्षात घेऊन, तसेच सर्व यज्ञांचा मी अधिपती असल्याने मला उद्देशून यज्ञ करून, ते परम सिद्धी मिळवतात.
ज्ञानधनाने अत्यंत संपन्न आणि विज्ञानाने परम पवित्र, असे ब्रह्मस्वरूप झालेले ब्राह्मण, यज्ञाच्याद्वारे माझे यजन करतात. त्यांची यज्ञ करण्याची पद्धतही अनोखी असते. ते आपल्या हृदयरूप मंदिरालाच यज्ञमंडप समजतात. कल्पनेने तेथील जमीन खणून श्रद्धेच्या माध्यमातून शम, दम आणि विरक्ति ह्या तीन कुंडांचे आकार तयार करतात. तेथे क्षर व अक्षर (जीव व शिव) या दोन अरणी (अग्नि उत्पन्न करण्याची लाकडे) घेऊन त्यांचे गुरुमंत्राने नीट मंथन करून काढलेला, धूर नसलेला असा सूक्ष्म अग्नि त्या कुंडामध्ये घालून पेटवितात. शुद्धसत्त्वरूप घृतात, रजतमादि होमद्रव्ये मिश्रित करून, युक्तीच्या मंत्रांनी, वैराग्यरूप लाकडी पळीने त्यात आहुती देतात. नंतर विद्यारूप लखलखीत शस्त्र हातात घेऊन, संकल्परूप पशु ठार मारून, यज्ञाच्या स्वामीला म्हणजे मला श्रीअनंताला निजबोधाने संतुष्ट करतात.
त्यात पूर्णाहुतीसाठी जीवभावाची आहुती देतात.
क्रमशः