धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम
राधानगरी/प्रतिनिधी
राधानगरी धरण (Radhanagari Dam) पाणलोट क्षेत्रात व दाजीपूर अभयारण्य (Dajipur Sanctuary) क्षेत्रात गेल्या आठवड्यापासून पावसाचा (Rain) जोर वाढत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत ही झपाट्याने वाढ होत आहे. असाच पावसाचा जोर राहिल्यास जुलै अखेरीस राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरेल असा अंदाज जलसंपदा विभागाने व्यक्त केला आहे. सध्या राधानगरी धरण ५२ टक्के भरल्याची माहितीही जलसंपदा विभागाने दिली आहे.
गेल्या २४ तासात धरण क्षेत्रात ८६ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तर आज अखेर ११०७ मिमी पाऊस झाला आहे, सध्या धरणाची पाणी पातळी ३२०.१८ फूट तर पाणी साठा ४२०७७.७७ दलघफू म्हणजे (४.२० टीएमसी) उपलब्ध आहे, पाण्याचे योग्य नियोजन व्हावे व संभाव्य पूर परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून जलसंपदा विभागाने बी ओ टी तत्वावर असलेल्या खाजगी जलविद्युत प्रकल्पातून १३५० क्यूसेकने विसर्ग भोगावती नदी पात्रता सुरू असून भोगावती नदी पात्रात पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.
हेही वााच : Sangli; जिल्ह्यात सरासरी 18.7 मि. मी. पाऊस; सर्वाधिक शिराळा तालुक्यात