राधानगरी प्रतिनिधी
जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाने राधानगरी तलावाच्या पाणी पातळीत वाढ होऊन काल धरणाचा ४ था दरवाजा उघडला होता. ३ऱ्या आणिल ४थ्या दरवाजातून एकूण ७ हजार ३०० क्यसेक पाण्याचा विसर्ग सुरु झाला होता. त्यामुळे प्रशासनाने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला होता.
पण पाण्याचा विसर्गामुळे आता ४ था दरवाजा पहाटे ४ वाजून १९ मिनिटांनी बंद झाल्याची बातमी येत आहे. आज ११ तारखेला धरणाचा ४ था स्वयंचलित दरवाचा पाण्याच्या ७ हजार ३०० क्युसेकने विसर्ग सुरु झाल्याने बंद झाला. अजूनही राधानगरी धरणाचे ५ आणि ६ नंबरचे दरवाज्यातून विसर्ग सुरू असून ४ हजार ४०० क्युसेकने विसर्ग सुरु आहे. त्यापैकी २८५६ क्यसेक विसर्ग दोन्ही दरवाजातून होत आहे तर १६०० क्युसेकचा विसर्ग पॉवरहाऊस मधून होत आहे.