ऑनलाईन टिम / नवी दिल्ली
चलनवाढीचा वाढता दबाव आणि त्यातच धोरणात्मक दर वाढवण्याची मागणी होत असताना, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी RBI ला कधीतरी दर वाढवावे लागेलच असे सांगून वादाला तोंड फोडले आहे.
रघूराम राजन यांनी राजकीय नेते आणि नोकरशहा यांना असेही सुचवले की, चलनवाढीला आळा घालण्यासाठी धोरणात्मक दर वाढवणे ही “काही राष्ट्रविरोधी कृती” नाही. ही देशाच्या आर्थिक स्थिरतेसाठी केलेली गुंतवणूक आहे. आपल्या सोशल मिडीयावरील पोस्टमध्ये, राजन म्हणाले की, चलनवाढीविरूद्धचे युद्ध कधीही संपलेले नाही, याचबरोबर “गेल्या वेळी काय घडले?” केंद्रीय बँकेने लक्षात ठेवले पाहीजे.
आरबीआयने देशांतर्गत दरवाढीला पाठिंबा देण्यासाठी धोरणात्मक दर कायम ठेवले आहेत. वाढत्या महागाईमुळे अस्वस्थता वाढत असताना, मध्यवर्ती बँकेने या आर्थिक वर्षासाठी महागाईचा अंदाजित दर 4.5 टक्क्यांवरून 5.7 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. तसेच महागाईला प्राधान्य देत वाढीचा अंदाजे दर ७.८ टक्क्यांवरून ७.२ टक्क्यांवर आणला आहे.
आपल्या पोस्टमध्ये, राजन यांनी राजकारणी आणि नोकरशहांना या गोष्टी अगोदर समजून घेण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणतात की पॉलिसी रेट वाढणे ही “परकीय गुंतवणूकदारांना फायदा देणारी गोष्ट काही देशविरोधी कृती नसून आर्थिक स्थिरतेसाठी केलेली गुंतवणूक आहे, ज्याचा सर्वात मोठा उरभाक्ता भारतीय नागरिक आहे.”