ऑनलाईन टीम/तरुण भारत
देशात दररोज लोकशाहीची हत्या सुरु आहे. देशामध्ये चार लोकांची हुकूमशाही सुरु आहे. सध्या देशातील परिस्थिती भयानक आहे. आम्हाला फक्त अटक केलं जात आहे. देशात महागाई, बेरोजगारीविरोधात बोलू दिलं जात नाही. काँग्रेसनं (congress) जे ७० वर्षात कमावलं ते भाजपनं (BJP) ७ वर्षात गमावलं आहे, अशी टीका काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केली आहे. काँग्रेसने (Congress) आज महागाई (Inflation) आणि बेरोजगारीविरोधात (Unemployment) देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. त्याआधी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका मांडली.
दरम्यान, महागाई, बेरोजगारीवर संसदेत बोलू देत नाहीत. विरोधकांना केंद्रीय यंत्रणांची भिती दाखवली जाते, असं म्हणत या देशात गेल्या ७० वर्षांत जे कमावलं गेलं ते आठ वर्षांत मोदी सरकारने गमावलं असा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी केला आहे.
राहुल गांधी म्हणाले की, सर्वांत जास्त बेरोजगारी भारतात आहे. पेट्रो-डिझेल आणि गॅसच्या दरात वाढ होत आहे. मात्र, अर्थमंत्र्यांना हे दिसत नाहीय. कोणत्याही गावात आणि शहरात गेलात तर तिथले लोक सांगतील किती महागाई वाढली आहे ते. मात्र सरकारला हे दिसत नाहीय.
काँग्रेस कार्यकर्ते आज महागाई, बेरोजगारीविरोधात आंदोलन करणार आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या दिल्लीतील निवासस्थानाला घेराव घालण्याचा प्रयत्न करणार आहेत. नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची चौकशी करत आहे. या मुद्द्यावरुन संसदेत सरकारला घेरण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. तर एक पाऊल पुढे जात काँग्रेसने महागाई आणि बेरोजगारीबाबत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर आक्रमक भूमिका घेतली आहे. या आंदोलनाआधी राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधला.
हे ही वाचा : कर्जाचा हप्ता आणखी वाढणार; RBI ने रेपो दरात केली वाढ
काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, आज देशात फक्त चार लोकांची हुकूमशाही आहे. महागाई, बेरोजगारी या मुद्द्यांवर चर्चा करायची आहे, पण त्यावर चर्चा करू दिली जात नाही. आम्हाला तुरुंगात टाकले जाते. लोकशाही संपत चालली आहे. असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
आमच्या सरकारमध्ये संस्था न्याय्य होत्या
जेव्हा आमचे सरकार होते, तेव्हा केंद्रीय संस्था आणि इतर घटनात्मक संस्था निष्पक्ष होत्या, असे राहुल गांधी म्हणाले. पण आज त्यांच्या मदतीने विरोधक उभे राहतात. तसेच भाजप सरकारने सर्व यंत्रणा आणि संस्था आपल्या ताब्यात ठेवल्या आहेत.