Rahul Gandhi should avoid talking about Savarkar – Baban Salgaonkar
वीर सावरकरांविषयी आमच्या मनामध्ये आदराची भावना आहे. ने मजसी परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला असा दिव्य गीत ज्यांनी लिहून देशाविषयी असलेली आपली भावना व्यक्त केली त्या सावरकरांविषयी सातत्याने राहुल गांधी यांच्याकडून सावरकरांविषयी वक्तव्य होत आहे. याबाबत महाराष्ट्रातील मराठी मनामध्ये चीड निर्माण होत आहे अशी वक्तव्य राहुल गांधी यांनी टाळावीत.राहुल गांधी हे आज भारत जोडो ही पदयात्रा घेऊन निघाले आहेत त्यांच्या पदयात्रेला चांगला प्रतिसादही मिळत आहे. देश विशिष्ट परिस्थितीत जात असताना सामाजिक दरी निर्माण होत आहे. सामाजिक एकोपा वाढण्यासाठी राहुल गांधीं यांचा लढा सुरू आहे राहुल गांधी यांच्या विषयी आमच्या मनामध्ये आदराची भावना आहे परंतु सावरकरांविषयी वादग्रस्त वक्तव्य त्यांनी टाळणे आवश्यक आहे असे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी मत व्यक्त केले .
सावंतवाडी / प्रतिनिधी