तिरुपती येथे झाले पुरस्काराचे वितरण
प्रतिनिधी/कोल्हापूर
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहूल पाटील यांना राष्ट्रीय स्तरावरील ‘राजीव गांधी बेस्ट डिस्ट्रीक्ट पंचायत ऍ’ ने सन्मानित करण्यात आले. तिरुपती येथील हॉटेल ब्लिस (दरबार हॉल) येथे पुरस्काराचे वितरण झाले.
भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषद नवी दिल्ली आणि जेई ऍकॅडमी ऑफ ग्रासरुटस् स्टडीज् ऍण्ड रिसर्च ऑफ इंडिया, तिरुपती यांच्या संयुक्त विद्यमाने तिरुपती येथे राष्ट्र उभारणीत गावांची भूमिका आव्हाने आणि उपाय या विषयावर राष्ट्रीय परिसंवाद पार पडला. या परिसंवादामध्ये सन 2021-22 या आर्थिक वर्षातील कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील आणि तेजस्विनी राहुल पाटील यांना ‘राजीव गांधी बेस्ट डिस्ट्रिक्ट पंचायत या नॅशनल अवॉर्ड’ ने सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार प्रोफेसर श्रीमती व्यंगमा – डायरेक्टर ऑफ मेडिकल कॉलेज तिरुपती अँड व्हाईस चान्सलर ऑफ तिरुपती युनिव्हर्सिटी यांचे हस्ते तसेच डॉक्टर श्री डब्ल्यू. आर. रेड्डी फॉर्मर डायरेक्टर जनरल ऑफ नॅशनल इन्स्टिटय़ूशन ऑफ रुरल डेव्हलपमेंट अँड पंचायतराज, पद्मश्री अवॉर्ड विजेते एस. दामोदरन – फाउंडर अँड सीइओ ऑफ ग्रामलया तिरुचिरापल्ली, व्यंकटराव घोरपडे वाईस प्रेसिडेंट कर्नाटका पंचायतराज, रॉड्रीगेज प्रेसिडेंट ऑफ महिला शक्ती अभियान गोवा, डॉ. सुंदर राम डायरेक्टर ऑफ अकॅडमी ऑफ ग्रासरूट स्टडीज अँड रिसर्च ऑफ इंडिया तिरुपती यांच्या प्रमुख उपस्थितीत वितरित करण्यात आला.
या परिसवंदमध्ये सहभागी होताना राहुल पाटील यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या विविध योजना व नाविन्यपूर्ण उपक्रमांचे सादरीकरण केले. यामध्ये पर्यावरण पूरक गणेशोत्सव, हर घर जल, दिव्यांग उन्नती अभियान, बायोगॅस प्रकल्प, विधवा प्रथा बंदी, महिला व बालकल्याण व समाज कल्याण विभागाकडील योजना, क्रीडा प्रशाला शिंगणापूर, पूर परिस्थिती, कोविड 19 इत्यादी मुद्यांची मांडणी केली. तसेच भविष्यात ग्रामविकास बळकटीकरणासाठी 9 शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांची माहिती दिली. या कार्यक्रमास महाराष्ट्रातील कोल्हापूर सह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, तेलंगना, गोवा येथील जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायती तसेच ग्रामविकास मध्ये काम करणाऱया विविध संस्था सहभागी झाल्या होत्या.