अनेक ठिकाणी झाडांची पडझड ः राजस्थान-बिहारमध्येही वातावरणात बदल
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पूर्वमोसमी पावसाचा परिणाम आता उत्तर भारतातही दिसू लागला आहे. सोमवारी दिल्लीत 17.2 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. तापमानात घट होण्याबरोबरच वादळ आणि पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले. बऱयाच ठिकाणी झाडांची पडझड झाल्याने वाहतूकही खोळंबली होती. तसेच दमट हवामानाचा परिणाम हवाई वाहतुकीवर झाल्याने अनेक विमानफेऱया अन्यत्र वळविण्यात आल्या. दुसरीकडे, खासगी संस्था आणि कॉर्पोरेट कार्यालयांना गुरुग्राममधील पावसामुळे रस्त्यांवर जाम टाळण्यासाठी त्यांच्या कर्मचाऱयांनी घरून काम करण्याचा सल्ला दिला आहे.
देशाची राजधानी दिल्लीत सोमवारी पहाटे वातावरणात बदल झाला. सोसाटय़ाच्या वाऱयासह सुरू झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आणि वीजपुरवठा खंडित झाला. त्याचवेळी पावसामुळे अनेक उड्डाणे थांबवावी लागली. दिल्ली विमानतळाने प्रवाशांना त्यांच्या उड्डाण तपशीलासाठी संबंधित विमान कंपनीशी संपर्क साधण्याची विनंती केली आहे. दिल्ली-एनसीआरमधील हवामानातील बदलामुळे अनेक उड्डाणे जयपूर आणि इतर विमानतळांकडे वळवण्यात आली आहेत.
राजस्थानमध्येही हवामान सतत बदलत आहे. कडक उन्हानंतर राज्यात सक्रिय झालेल्या नवीन हवामान प्रणालीमुळे वादळी वाऱयासह पाऊस पडत आहे. पुढील 48 तास राज्यात असेच वातावरण राहणार असल्याने जयपूरसह राजस्थानच्या 16 जिह्यांमध्ये वादळी वाऱयासह पाऊस पडण्याची शक्मयता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच काही भागात गारपिटीचा इशाराही देण्यात आला आहे. पाकिस्तानातून सक्रिय झालेल्या नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव राजस्थानमध्ये सुरू झाला आहे. त्यामुळे जयपूर, उदयपूर, कोटा, भरतपूर आणि अजमेर विभागात पुढील 48 तासांत वादळी वाऱयासह पाऊस पडेल, असे जयपूर हवामान केंद्राचे संचालक राधेश्याम शर्मा यांनी सांगितले.
बिहारमध्येही पर्जन्यवृष्टी
मान्सूनपूर्व पावसामुळे बिहारमधील अनेक जिह्यांमध्ये वादळी वाऱयासह जोरदार वारे वाहू लागले आहेत. बिहारमधील 25 जिल्हय़ांमध्ये बऱयाचठिकाणी सोमवारी पावसाच्या धारा कोसळल्याची नोंद झाली आहे. या पावसामुळे तापमानात 5 अंश सेल्सिअसनी घसरण झाली आहे. राज्यातील बहुतांश जिह्यात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस झाला. सोसाटय़ाच्या वाऱयामुळे झाडे उन्मळून पडली व विजेचे खांब उन्मळून पडल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. येत्या 24 तासांत गारांसह मुसळधार पावसाची शक्मयता हवामान खात्याने वर्तवली आहे. लखनौमध्ये दुपारी वादळासह मुसळधार पाऊस झाल्यामुळे वातावरण आल्हाददायक झाले होते. पहाटे मेरठ, गौतमबुद्ध नगर, गाझियाबाद, सहारनपूर, मुरादाबादसह संपूर्ण पश्चिम उत्तर प्रदेशात पाऊस झाला.