इको सिस्टीम ने मनसेला भाजपची बी टीम ठरवण्याचा प्रयत्न झाला
ऑनलाईन टीम/तरुण भारत
गुढी पाडवायच्या सभेनंतर राज ठाकरे (raj thackeray) यांच्यावर मनसे (MNS) भाजपची (BJP) बी टीम असा आरोप विरोधक करत आहेत. पण महाविकास आघाडी सरकारने एखादी खोटी गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी इको सिस्टम तयार केली आहे. त्यासाठी जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) काहीतरी बोलतात, त्यांनतर अजित पवार (ajit pawar) बोलतात. आता तर यात आदित्य ठाकरेंचीही (Aaditya Thackeray) भर पडली आहे. त्यामुळे त्यांना मानले पाहिजे, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी केली आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांच्या काल झालेल्या ठाण्यातील सभेवरही चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले. तसेच त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका देखील केली. यावेळी बोलताना पाटील म्हणाले, राज ठाकरेंच्या पाडव्याच्या सभेनंतर विरोधक मनसे ला भाजपची बी टीम म्हणत आहे. महाविकास आघाडी खोटी माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी नवीन इको सिस्टम चा वापर करत आहे. यासाठी ठाण्यात जितेंद्र आव्हाडांनी बोलायचं, पुण्यात अजित पवारांनी बोलायचं. आता तर आदित्य ठाकरेही यात सामील झालेत, असा निशाणा त्यांनी यावेळी साधला. ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.
पुढे बोलताना पाटील म्हणाले, राज ठाकरे यांची स्वतंत्र ओळख आहे. राज ठाकरे हे स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, ते कोणाची बी टीम म्हणून काम करणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
तसेच हिंदुत्वाचा मुद्दा आता ऐरणीवर आलाआहे. त्यामुळे तो हिंदुत्वाचा मुद्दा भारतीय जनता पार्टीला नव्याने घ्यावा लागणार नाही. कारण हिंदुत्व हा भाजपाचा श्वास आहे. तसेच हिंदुत्व हा भाजपचा आत्मा आहे. त्यामुळे राज ठाकरे जो काही हिंदुत्वाचा मुद्दा मांडत आहेत तो मुद्दा भाजप जन्मापासून मांडत आहे, असेहा त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
तर अलीकडे काहीजण अयोध्या मस्जिद पडल्याचं श्रेय घेत आहेत. हिंदुत्वाविषयी बोलत आहेत. त्यामुळे भाजपला हिंदुत्व नवीन नाही. आम्ही भाजपच्या जन्मापासूनच हिंदुत्वाचा मुद्दा मांडत आलो आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
तसेच, महाविकास आघाडीने सत्तेचा दुरुपयोग करून भारतीय जनता पक्षाच्या नेतेमंडळी वर गुन्हा दाखल करण्याचा सपाटा सुुरू ठेवला आहे. खोट्या केसेस करून गुन्ह्यात अडकविण्याची कारस्थान महाविकास आघाडी करत आहे अशी टीका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. तसेच सरकार गुन्हा दाखल करण्याची एक ही संधी सोडत नाही. पण जेव्हा हे प्रकरण कोर्टात जातं तेव्हा मात्र सरकार तोंडावर पडतं, अशी टीका त्यांनी यावेळी केली. तसेच राज्य सरकार सत्तेच दुरुपयोग करून या कारवाया करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.