ऑनलाईन टीम/तरुण भारत
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या ताफ्यातील गाड्यांना अपघात झाल्याची बातमी समोर येत आहे. राज ठाकरेंच्या ताफ्यातील मागील बाजूस असलेल्या तीन गाड्या एकमेकांना धडकल्या असल्याचं समजत आहे. औरंगाबाद (aurangabad) जवळील वाळूज येथे हा अपघात घडल्याची माहिती आहे. याआधी घोडेगाव येथे काही वेळांपूर्वी ताफ्यातील गाड्यांचा अपघात घडला होता. त्यामध्ये दोन गाड्यांचं नुकसान झालं होतं. यामध्ये अभिनेते केदार शिंदे (kedar shinde), आणि अंकुश चौधरी (Ankush Choudhary) यांच्या गाडीचा बोनटचे नुकसान झाल्याची माहिती आहे. अहमदनगरच्या पुढे घोडेगाव नजीक गाड्या धडकल्या आहेत. दरम्यान, या अपघाताबद्दल अद्याप अधिक माहिती मिळू शकलेली नाही आहे.
तर वाळूज येथे पुण्याच्या शहराध्यक्ष साईनाथ बाबर (Sainath Babar) यांच्या गाडीलाही अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात बारा गाड्यांच नुकसान झालं आहे. त्यांच्या या दौऱ्यातील अपघाताच्या मालिकेनंतर राज ठाकरे सुखरुपपणे औरंगाबाद मध्ये दाखल झाले आहेत. यावेळी कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांचं जंगी स्वागत केलं आहे.
दरम्यान, औरंगाबादेत राज ठाकरे यांनी 1 मी रोजी (रविवारी) सभ होणार आहे. ते आज पुण्यातून औरंगाबादसाठी निघाले होते. या प्रवासादरम्यान राज ठाकरेंचं ठिकठिकाणी जंगी स्वागतही केलं जात आहे.