Rajaguru in Salaiwada should be repaired by the Panand Municipality – NCP’s demand
तीस वर्षाहून अधिक काळ लोटला तरी सालईवाड्यातील राजगुरू पाणंद (सामंत गॅरेज) पालिकेने दुरुस्त केली नाही. ही पाणंद रहिवाशांसाठी धोकादायक बनली आहे त्यामुळे ही पाणंद लवकरात लवकर दुरुस्त करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शहर महिला अध्यक्ष एडवोकेट सायली दुभाषी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पालिकेकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्य लिपिक आसावरी शिरोडकर यांना निवेदन दिले .सालाईवाड्यातील राजगुरू पाणंद दुरुस्त होऊन तीस वर्षे लोटली आहेत .परंतु त्याची देखभाल व दुरुस्ती त्यानंतर झाली नाही.घुशी, उंदीर यानी पाणंद पोखरलेली आहे त्यामुळे रहिवाशांसाठी ती धोकादायक बनली आहे. रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे .त्यामुळे पाणंदीची दुरुस्ती करावी अशी मागणी करण्यात आली आहे शिष्टमंडळात तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवा टेमकर ,राकेश नेवगी, फिरोज खान, रेहना खान ,महमंद खान ,मनोहर सामंत ,प्रिसिला फर्नांडिस, विनोद नाटेकर आदी उपस्थित होते.
सावंतवाडी / प्रतिनिधी