राधानगरी धरणात 78 % पाणीसाठा
कोल्हापूर: गेल्या पंधरा दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. काल दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यांच्या नदी पातळीत वाढ झाली आहे. गगनबावडा,शाहूवाडी आणि भुदरगड तालुक्यात मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. तर कोल्हापुरातील पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा उदास दुसऱ्यांदा पाण्याखाली गेला आहे. पंचगंगा नदी ही एकोणीस फुटांवरून वाहत असून आज सकाळपासून पावसाचा जोर काही अंशी कमी आहे. तर राधानगरी धरण क्षेत्रात पावसाचा जोर असून आज सकाळी 7 वाजेपर्यंत 78 टक्के भरले आहे. दरम्यान गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र पावसाने पुन्हा जोर धरल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. नऊ ऑगस्ट पर्यंत मुसळधार पाऊस राहणार असल्याचा इशाराही हवामान खात्याने दिलेला आहे.