मधुरिमाराजे छत्रपती: राजस्थानी जैन श्वेतांबर मारवाडी समाजाकडून पांजरपोळ येथे मुक्य जनावरांसाठी 1 हजार किलो खाद्य वाटप
प्रतिनिधी/कोल्हापूर
राजषी शाहू महाराजांनी समतेचा विचार जगाला दिला. संस्थानातील जनता सुशिक्षित, शहाणी व्हावी, स्वबळावर उभी राहावी यासाठी त्यांनी शिक्षणाचा सक्तीचा कायदा केला. तसेच 20 बोर्डिंग हाउसची स्थापना केली. शेतकऱयांना अवजारे उपलब्ध होण्यासाठी शिवाजी उद्यम नगरची उभारणी केली. त्यांचे जनावरांच्या विषयी खूप प्रेम होते. भटक्मया जनावरांची सोय व्हावी म्हणून पांजरपोळ संस्थेची त्यांनी स्थापना केली. अशा महान राजाच्या कार्यातून उतराई होण्यासाठी राजस्थानी जैन स्वेतांबर मारवाडी समाजान केलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याच प्रतिपादन मधुरिमाराजे छत्रपती यांनी केले.
कोल्हापूरातील राजस्थानी जैन श्वेतांबर मारवाडी समाजाच्यावतीने राजषी शाहू महाराज स्मृती शताब्दी निमित्य समाजातील विविध ट्रस्टच्या पुढाकारातून पांजरपोळ संस्थेतील जनावरांसाठी सुमारे 1 हजार किलो खाद्य देण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. यशराजे छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती होती.
शंभर वर्षापूर्वी राजषी शाहू महाराजांनी उभारलेल्या पांजरपोळ संस्थेतील जनावरांसाठी फळभाजी, गूळ, चारा असे एक हजार किलो साहित्य देण्यात आले. आरोग्य सेवेत उत्तम काम करत असणाऱया बंटी सावंत यांचाही गौरव करण्यात आला. माजी नगरसेवक ईश्वर परमार यांनी मनोगत व्यक्त केले. नरेंद्र ओसवाल, सराफ संघाचे अध्यक्ष राजेश राठोड, के.जी.ओसवाल, जवाहर गांधी, राजेश ओसवाल, बाबूलाल ओसवाल, बिपीन परमार, राजू निमजिया, वेलचंद ओसवाल, सुभाष गुंदेशा, जयेश ओसवाल, मयूर सुराणा आदी उपस्थित होते.
शाहू महाराजांमुळे सराफ व्यावसायिकांना बळ
राजषी शाहू महाराजांचे कार्य कर्तुत्व खूप मोठ आहे. त्यांनी मारवाडी समाजाला कोल्हापुरात बोलवून घेतले. गुजरीची स्थापना केली. त्यामुळ येथें अनेक पिढ्या घडल्या. थ्यांनी सुवर्ण चांदी कारागिरांना तसेच सराफ व्यवसायाला उभारी आणि बळ देण्याच काम केले आहे. त्यांच्या ऋणातून काही अंशी उतराई होण्यासाठी या उपक्रमाच आयोजन केल्याचे भरत ओसवाल यांनी सांगितले.
राजाप्रमाणेच प्रजा
राजेशाहीचा अस्त झाला. मात्र, कोल्हापूरकरांनी त्यांच्या जागतिक पातळीवर लौकिक असलेल्या राजाच्या स्मृती आजही कायम ठेवलेल्या आहेत. त्यामुळे राजा प्रमाणच येथील प्रजा असल्याचे गौरवोद्गार मोहब्बत सिंग देवोल यांनी काढले.