राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्र्यांचे मानले आभार
पणजी : गोव्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते राजेंद्र आर्लेकर यांची बिहार राज्याचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली असून राज्यातील बिहारी लोकांनी त्यांचे अभिनंदन कऊन आनंद प्रकट केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा व राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जो विश्वास दाखवला त्याबद्दल आर्लेकर यांनी त्यांचे आभार मानले आहेत. आर्लेकर हे यापूर्वी हिमाचल प्रदेशचे राज्यपाल होते. तेथून त्यांची बदली बिहार राज्यासाठी करण्यात आली आहे. सध्या ते आपल्या मुलाच्या विवाहासाठी गोव्यात असून लवकरच काही दिवसात बिहारचे राज्यपाल म्हणून ताबा घेणार आहेत. ते म्हणाले की, लहान – मोठे राज्य असे काही नसते परंतु त्याचा इतिहास, भूगोल यात फरक असतो. शेवटी सरकारसाठीच काम करायचे असते कारण ते आपले सरकार असते. हिमाचल प्रदेश, बिहार या दोन्ही राज्यात इतिहास, भूगोल असा फरक आहे. हिमाचलला गेलो तेव्हा अनेक हिमाचली लोक गोव्यात असल्याचे आपण पाहिले तसेच अनेक बिहारी लोक गोव्यात वास्तव्य कऊन आहेत. गोव्याचा माणूस बिहारचा राज्यपाल झाला म्हणून त्यांनी फोनवऊन, प्रत्यक्ष भेटून आनंद व्यक्त केल्याचे आर्लेकर यांनी नमूद केले. त्यामुळे आपणास समाधान मिळाले, असे त्यांनी सांगितले. दोन दिवसांनी शिमला येथे जाऊन हिमाचल प्रदेशची काही कामे पूर्ण कऊन नंतर तेथूनच बिहारकडे जाणार आणि ताबा घेणार असल्याचे त्यांनी नमूद केले.