कोल्हापूर : कोल्हापूर दौऱ्यावर असलेले महसूलमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला . यावेळी राजू शेट्टी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर विचारले असता, “राजू शेट्टी यांनी सरकारकडून एकदा वस्तुस्थिती समजून घेतली पाहीजे. यावर राजकारण होऊ नये अशी आमची इच्छा आहे. तसेच त्यांच्या काही सूचना असतील तर त्यांनी कळवाव्यात” असे मत व्यक्त केले. काही दिवसापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी .यांनी लम्पी आजाराबाबत राज्य सरकार उदासिन आहे यावर हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती.
तानाजी सावंत यांच्या वादग्रस्त विधानावर प्रतिक्रिया विचारल्यावर ते म्हणाले “सावंत यांचं विधान वस्तुस्थितीला धरून नव्हतं. मंत्र्यांनी अशी विधान करणे टाळल पाहिजे. सवंग लोकप्रियतेसाठी अशा विधानामुळे प्रश्न सुटण्याऐवजी गंभीर होतात” असा इशारा त्यांनी दिला. तसेच “आदित्य ठाकरे यांच्याकडे सध्या भरपूर वेळ आहे. यानिमित्ताने ते बाहेर पडले आहे. त्यांना अजून भरपूर शिकायचा आहे. वस्तुस्थितीचा विपर्यास करणे हे राज्याच्या विकासासाठी चांगल द्योतक नाही.” असा सल्ला त्यांनी आदित्य ठाकरे यांना दिला.