ऑनलाईन टीम/तरुण भारत
राज्यात मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालीसावरुन वातावरण तापलेलं आहे. राज ठाकरेंच्या (raj thacheray) गुढी पाडव्याच्या दिवशी झालेल्या सभेनंतर राज्यात विविध मुद्यांवरून वादंग सुरु झाला आहे. याच वादंगाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी (RPI Ramdas Athawale) आता थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना (MNS Raj Thackeray) आव्हान दिलं आहे. अजानला विरोध करणं चुकीचं असून राज ठाकरे समाजामध्ये तेढ निर्माण करत असल्याचा आरोप रामदास आठवले यांनी केला आहे. तसंच रिपाईंचे कार्यकर्ते 3 मे रोजी ठिकठिकाणी मशिदीवरच्या भोंग्यांना संरक्षण देतील, असंही रामदास आठवले म्हणालेत.
केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेला विरोध केला असून राज यांनी अजानला विरोध करणं चुकीचं असून ते समाजामध्ये तेढ निर्माण करत असल्याचा आरोप रामदास आठवले यांनी केला आहे. तसंच रिपाईंचे कार्यकर्ते 3 मे रोजी ठिकठिकाणी मशिदीवरच्या भोंग्यांना संरक्षण देतील, असंही रामदास आठवले म्हणालेत. राज ठाकरेंच्या औरंगाबादच्या सभेला परवानगी देऊ नका, अशी मागणीही आठवलेंनी केली आहे.. आठवलेंच्या या वक्तव्यांमुळे आता मनसे विरुद्ध रिपाइं असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.
अजान काही मिनिटांची असल्याने त्रास होत नाही
रामदास आठवले म्हणाले की, अजानला विरोध करणे चुकीचे आहे. अजान काही मिनिटांची असते. त्यामुळे कोणाला त्रास होत नाही, असं आठवले म्हणाले. तसेच मशिदीवरील भोंगे उतरवण्याचा प्रयत्न केल्यास रिपाइचे कार्यकर्ते ठिकठिकाणी मशिदीवरच्या भोंग्यांना संरक्षण देतील, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.