नदीकाठावरील भातशेतीला धोका, पावसाची संततधार सुरूच
प्रतिनिधी /बेळगाव
मागील तीन दिवसापासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे नदी, नाले आणि जलाशयाच्या पाणी पातळीत झपाटय़ाने वाढ झाली आहे. त्यामुळे नदीकाठी असलेल्या भातपिकांना धोका निर्माण झाला आहे. यापूर्वी दोन वेळा पुराचा फटका बसला होता. पुन्हा पावसाने जोर वाढविल्याने भातशेती धोक्मयात आली आहे.
शनिवारी रात्रीपासून संततधार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे नदी काठावरील भातपिकाला फटका बसला होता. दरम्यान बहुतांश शेतकऱयांनी दुबार लागवड केली होती. त्यानंतर समाधानकारक पाऊस झाला होता. त्यामुळे पिके देखील जोमाने आली होती. मात्र आता पुन्हा पावसाने जोर वाढविल्याने शेतकऱयांची चिंता वाढली आहे. रविवारच्या जोरदार पावसानंतर सोमवारीही पावसाची रिपरिप सुरूच होती. त्यामुळे पाणी पातळीत वाढ होत आहे. दरम्यान रविवारी दुथडी भरून वाहणाऱया मार्कंडेय नदीचे पाणी सोमवारी पात्राबाहेर पडले. त्यामुळे भातपिकाला धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, पाऊस सतत पडत राहिल्यास नदीकाठचे भातपीक वाया जाण्याची चिंता शेतकऱयांतून व्यक्त होत आहे.
धरणाचे दोन दरवाजे उघडले
मागील चार वर्षात अतिपावसामुळे शेतकऱयांना मोठा फटका बसला आहे. गतवषी परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले होते. यंदा तीच परिस्थिती निर्माण होते की काय? या चिंतेत शेतकरी आहेत. बैलूर, गोल्याळी, बाकनूर या परिसरात पाऊस अधिक असल्याने मार्कंडेय नदीच्या पाणी पातळीत झपाटय़ाने वाढ होत आहे.
पाऊस कमी न झाल्यास नदीकाठावरील शेती पुन्हा धोक्मयात येण्याची शक्यता आहे. शिवाय राकसकोप जलाशयाचे दोन दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे मार्कंडेयचे पाणी वाढले आहे. त्यामुळे नदीकाठचा शिवार जलमय होत आहे. पाऊस पुन्हा वाढल्यास शेती पूर्ण पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.
बळ्ळारी नाल्याला चौथ्यांदा पूर : शेतकरी हतबल, नुकसानभरपाई मिळणार का?
बळ्ळारी नाला हा शेतकऱयांना नेहमीच नुकसानीचा ठरला आहे. या नाल्यामध्ये वाढलेली जलपर्णी आणि साचलेला कचरा यामुळे बळ्ळारी नाला परिसरातील शेकडो एकर जमिनीला पुराचा फटका वारंवार बसत आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे पुन्हा या नाल्याला पूर आला असून वर्षभरात हा चौथा पूर आहे. त्यामुळे शेतकरी अक्षरशः हतबल झाला आहे. भात लावणी केलेले पीकही पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे चौथ्यांदा शेतकऱयांना फटका बसला.
येळ्ळूर रस्त्यापासून सुरू झालेला हा बळ्ळारी नाला शेतकऱयांना शाप ठरत आहे. केवळ राजकीय व्यक्तींच्या हेकेखोरपणामुळे शेतकरी भरडला जात आहे, असा आरोप आता शेतकऱयांतून होत आहे. अनेक शेतकरी संघटना या नाल्याची खोदाई करावी, नाल्यातील जलपर्णी काढावी, अशी मागणी वारंवार करत आहेत. मागणी करून करून सर्वांनीच अक्षरशः हात टेकले आहेत. पण जिल्हा प्रशासनाला त्याची थोडीही काळजी नसल्याचे दिसून येत आहे.
यावर्षी तर या नाल्याच्या परिसरातील जमिनीमध्ये कंबरभर पाणी साचल्याने पूर्ण पीक कुजून गेले आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास शेतीच नको म्हणण्याची वेळ शेतकऱयांवर येणार आहे. दरवषीच नुकसान होत असल्यामुळे करायचे तरी काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. भात पेरणी करायची, त्यानंतर ते पाण्याखाली कुजताना पाहायचे. पाणी कमी झाल्यानंतर भात लावणी करायची, पुन्हा ते लावणी केलेले भात पाण्याखाली कुजून जातेय, असा प्रकार वारंवार घडत आहे. तेव्हा शेतकऱयांना शेती तशीच ठेवायची की पेरायची? असा प्रश्न पडत आहे.
गेल्या तीन दिवसांपासून सुरू झालेल्या या पावसामुळे बळ्ळारी परिसरातील शेकडो एकर जमीन पाण्याखाली गेली आहे. यामुळे शेतकऱयांना आता मोठा फटका बसला आहे. मध्यंतरी पाऊस गेल्याने घाईगडबडीत शेतकऱयांनी भात लावणी केली होती. त्यासाठी मोठा खर्च केला होता. पण पुन्हा ते पीक पाण्याखाली गेले आहे. आता यापुढे तरी भात लावणी करणे अशक्मय आहे. त्यामुळे दोन ते तीन वेळ खर्च केलेली रक्कमही वाया गेली आहे.
एकरी किमान 50 हजार रुपये नुकसान भरपाई द्या
पुरामुळे नुकसान झाल्यानंतर शेतकऱयांना एकरी केवळ 2 ते अडीच हजार रुपये रक्कम दिली जाते. मात्र ही रक्कम कुचकामी ठरत आहे. एकरी किमान 50 हजार रुपये तरी नुकसान भरपाई दिली पाहिजे. कारण सध्या शेतकऱयांना एकरी 50 हजार रुपयांपेक्षा अधिक खर्चच आहे. त्यामुळे तातडीने शेतकऱयांना एकरी 50 हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.