संक्रांत अशुभ नाहीच! हे तर प्रकाशपर्व–
माहिती आणि उपाय
संक्रांतीचा पुण्य काळः सूर्योदयापासून 12.45 प. 5.45.
महा पुण्य काळ स. 09.09 प.
संक्रांत म्हणजे काय तर पुढे जाणे. कुणाचे? सूर्याचे. मकर संक्रांत म्हणजे काय? पृथ्वीला केंद्रस्थानी धरून बाहेरच्या पूर्ण आकाशाला बारा भागात विभागले तर मेष पासून मीनपर्यंत बारा राशी तयार होतात. सूर्याचे भ्रमण जेव्हा धनुमधून मकरमध्ये होते तो दिवस म्हणजे मकर संक्रांत. प्रत्येक इंग्रजी महिन्याच्या 14/15 तारखेला सूर्य आपली राशी बदलतो. म्हणजे पुढच्या राशीत प्रवेश करतो. याचा अर्थ एका वर्षात 12 संक्रांती असतात. त्यात सगळय़ात महत्त्वाची संक्रांती म्हणजे मकर संक्रांत आणि कर्क संक्रांत. मकर संक्रांतीला दिवस मोठा आणि रात्र छोटी होत जाते आणि कर्क संक्रांतीला दिवस छोटा आणि रात्र मोठी होत जाते. याचदिवशी उत्तरायणाचा प्रारंभ होतो. उत्तरायण म्हणजे काय? तुम्ही जर नीट निरीक्षण केले असेल तर तुम्हाला कळेल की दर दिवशी सूर्य एकाच बिंदूपासून सुरू होत उगवत नाही, तो हळूहळू पृथ्वीच्या दक्षिण किंवा उत्तर दिशेकडे सरकत जातो. मकरसंक्रांतीला उत्तरायण सुरू होते म्हणजे उत्तरेकडे सरकायला सुरुवात होते. महाभारतकाळात भीष्मांनी, ज्यांना इच्छामरणाचे वरदान होते, शरशय्येवर याच दिवसाची वाट पाहिली होती. या दिवशी देवांचा दिवस चालू होतो म्हणूनच हा प्रकाश पर्व आहे. या दिवसाचे आणखी एक महत्त्व म्हणजे या दिवशी सूर्य आपल्या मुलाच्या, शनीच्या राशीत प्रवेश करतो. संपूर्ण विश्वामध्ये केवळ सनातन संस्कृती अशी आहे की ज्यामध्ये धर्म आणि विज्ञान यामध्ये संघर्ष नाही. उलट विज्ञानाचा जन्मच धर्मातून झालेला आहे. गणित हे वेदातून आले म्हणून वेदिक गणित, औषध विज्ञान वेदातून आले म्हणून आयुर्वेद, ग्रहांची गती-स्थिती, नक्षत्रांची माहिती ही सिद्धांत आणि संहिता या ज्योतिषीय विषयातून कळते. इतर देशांमध्ये ज्याप्रमाणे धर्म आणि विज्ञान एकमेकांच्या विरोधात असतात तसे सनातन संस्कृतीचे नाही. भारतात दोन हजाराहून जास्त सण साजरे केले जातात. हे सगळे सण केवळ रूढी किंवा परंपरा नसून सामाजिक एकोपा, पर्यावरण, स्वास्थ्य आणि आयुर्वेद या बरोबरच ज्योतिषीय महत्त्व आपल्यामध्ये सामावून घेणारे आहेत. या दिवशी काही खास उपाय पुण्य काळात आपण केले तर त्याचा नक्कीच फायदा आपल्याला होऊ शकतो. संक्रांतीला समुद्रात किंवा नदीत स्नान करावे. या दिवशी तीळमिश्रित पाण्याने आंघोळ करावी, तिळाचे उटणे लावावे. तिळाचा होम करावा. तीळ तर्पण करावे. तीळ खावे आणि तीळ दान करावे. सुर्याची मनोभावे पूजा करावी. देवाला तांदूळ, तीळ वहावे. खिचडी, गूळ पोळीचा नैवेद्य दाखवावा. पुण्य काळात खालील उपाय करू शकता. (1) बऱयाच वेळेला असे होते की आपल्या जागेवर दुसराच कोणीतरी कब्जा करून बसतो. अशावेळी शमीची 5 आणि बेलाची 11 पाने सूर्याकडे पहात सूर्यावरून सात वेळेला फिरवून शंकराच्या पिंडीवर अर्पण करावी. त्यातील एक शमीचे पान आणि एक बेलाचे पान त्या आपल्या जागेवर टाकावे. ज्या व्यक्तीने अवैध कब्जा केला आहे ती व्यक्ती जागा सोडून जाते असा अनुभव आहे.(2) घरामध्ये सदस्यांचे एकमेकांबरोबर पटत नाही. नवरा-बायकोमध्ये भांडणे होतात, भावा भावामध्ये वितुष्ट येते, सासू-सुनेचे लहान सहान गोष्टींवरही वाजते. अशावेळेला पाण्यामध्ये काळे तीळ आणि हळद घालून ते पाणी शिवलिंगावर अर्पण करावे. हे करताना ज्यांच्यामध्ये भांडणे आहेत त्यांची नावे घ्यावीत. (3) मूल मोठे झाले तरी अंथरूण ओले करते, रात्री दचकून उठते, अकारण रडते, काही भगिनींना मूल झाल्यावर पान्हा फुटत नाही किंवा पुरेसे दूध नाही येत नाही. अशावेळी पाण्यात गूळ मिसळावा. आणि त्याचा लेप शिवलिंगावरती करावा. लावलेल्या लेपामधून थोडा लेप मुलाचा डोक्मयावर लावावा, आईच्या छातीवर लावावा. (4) काही वेळा व्यापार बंधन केले जाते. चार दिवस दुकान उत्तम चालते आठ दिवस बिलकुल चालत नाही. अशावेळी बाभळीच्या एक काटा थोडे काळे तीळ थोडे पांढरे तीळ दुकानावरून एकवीस वेळा उतरवावे आणि वाहत्या पाण्यात सोडावे
मेष
तब्येतीची विशेष काळजी घ्यावी लागेल. खासकरून घसा किंवा श्वसनाचे विकार त्रास देऊ शकतात. मित्रांची योग्य वेळी साथ मिळेल. लाभ प्राप्ती उत्तम असेल. या काळात धनसंचय करण्याकडे लक्ष द्या. कौटुंबिक वातावरण पोषक असेल. कारण नसताना प्रवास करू नका. प्रॉपर्टीचा कामाला विलंब झाला तरी काळजी करण्याचे कारण नाही. नोकरदार वर्गाला अनुकूल काळ आहे. वैवाहिक जीवनात बहार येईल. उपाय
केळीच्या झाडाचे मूळ जवळ ठेवावे
वृषभ
लहान-सहान आजार दूर होतील. एक प्रकारचा आत्मविश्वास प्राप्त होईल. कामे उत्साहाने पूर्ण करण्याकडे कल असेल. पैशांच्याबाबतीत हलगर्जी करून चालणार नाही. या काळात कर्ज काढण्यापासून दूर राहणे शहाणपणाचे ठरेल. प्रवास टाळलेला बरा. छोटय़ा-मोठय़ा गुंतवणुकीतून फ़ायदा होईल. प्रेम प्रसंगात यश प्राप्त होईल. नोकरदार वर्गाला अधिकाऱयांकडून शाबासकी मिळेल.
उपाय केशराचा टिळा लावा
मिथुन
तब्येतीकडे दुर्लक्ष केले तर आजारपण येण्याची शक्मयता आहे सावध राहण्याची गरज आहे. अडकलेले पैसे सहजतेने मिळतील अशा भ्रमात राहू नका. कुटुंबात ज्ये÷ व्यक्तींशी वादावादी होण्याची शक्मयता आहे. प्रवासातून नुकसान संभवते. प्रॉपर्टीची कामे उत्तमरित्या पार पडतील. घरातील स्त्री वर्गाचा सहयोग प्राप्त होईल. कलाकारांना आणि खेळाडूंना उत्तम काळ आहे. नोकरदार वर्गाने कामात चूक होऊ देऊ नये.
उपाय कपिला गायीची सेवा करावी
कर्क
हवामानाचा त्रास होऊ शकतो. अंगदुखी डोकेदुखीसारखे किरकोळ आजार त्रास देऊ शकतात. कुटुंबामध्ये भांडण-तंटे होणार नाहीत याची काळजी घ्या. धनप्राप्तीकरता विशेष प्रयत्न करावे लागतील. प्रवासामधून फायदा होण्याची शक्मयता आहे. प्रॉपर्टीची कामे होतील. आईचा सल्ला मोलाचा ठरेल. प्रेमप्रसंगात मनस्ताप संभवतो. शेअर बाजारापासून दूर रहा. कामे वाढल्याने नोकरदार वर्गाला त्रास होईल.
उपाय मारुतीला लाल फूल अर्पण करावे
सिंह
मानेचे किंवा पोटाचे विकार त्रास देऊ शकतात. धनप्राप्ती उत्तम असेल. कौटुंबिक वातावरण उत्तम असेल. एखादा छोटेखानी समारंभ साजरा कराल. कामानिमित्त प्रवासाची शक्मयता आहे. लेखी व्यवहारांमध्ये यश प्राप्त होईल. भावंडांचे सहकार्य मिळेल. धोका असलेली कुठलीही गुंतवणूक करू नका. वैवाहिक जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. व्यावसायिकांना चांगले यश प्राप्त होईल. मानसन्मान प्राप्त होईल. मित्रांकडून फसवणूक होऊ शकते.
उपाय सूर्याला अर्घ्य द्या
कन्या
आरोग्याचा पाया भक्कम असला तरी दुर्लक्ष करू नका. या काळात तुमचा प्रभाव इतर लोकांवर पडेल. बुद्धिचातुर्याने अडचणींवर मात कराल. धनप्राप्ती उत्तम असेल. सोने चांदी खरेदी करण्याचे प्लॅन करू शकता. कुटुंबातील सदस्य एकमेकांना सहकार्य करतील. प्रवासाचा प्लॅन रद्द होऊ शकतो. प्रॉपर्टीची कामे सध्या पुढे ढकललेली बरी. छोटी मोठी गुंतवणूक फायदेशीर ठरेल. नोकरदार वर्गाला उत्तम काळ आहे.
उपाय गणेश दर्शन घ्यावे
तूळ
तब्येत उत्तम राहील. आत्मविश्वासपूर्वक कामांना पूर्ण कराल. कुटुंबातील वातावरणात छोटय़ाशा गोष्टीमुळे गडबड होऊ शकते. धनप्राप्तीकरता जास्त कष्ट करावे लागतील. प्रवास टाळायचा प्रयत्न करा. कागदोपत्री व्यवहारात सावध राहणे गरजेचे आहे. जमिनीच्या कामांमध्ये मनासारखे यश मिळणे कठीण दिसते. प्रेम प्रसंगांमध्ये आनंद प्राप्त होईल. गुंतवणुकीतून फायदा दिसतो.
उपाय देवीला कुंकुमार्चन करावे
वृश्चिक
तब्येतीला सांभाळावे लागेल. दूषित हवामानाचा किंवा पाण्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. पोटासंबंधी विकार त्रास देऊ शकतात. कुटुंबातील वातावरण खेळीमेळीचे ठेवण्याकरता प्रयत्न करावे लागतील. लहान मोठा प्रवास घडू शकतो. प्रॉपर्टीची कामे वेळेवर पूर्ण व्हावीत म्हणून प्रयत्न करावा लागेल. मनोरंजनाकडे कल असेल. नोकरदार वर्गाला अधिकाऱयांकडून त्रास होऊ शकतो. वैवाहिक जीवन उत्तम असेल.
उपाय पक्ष्यांना दाणे घाला.
धनु
तब्येतीची योग्य ती काळजी घेतली नाही तर त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात. त्यामुळे लहानसहान गोष्टींकडे दुर्लक्ष करू नये. गंभीर स्वभावाला थोडा हसमुख करण्याचा प्रयत्न करा. धनाचे व्यवस्थापन योग्य केले तर फायदा होईल. प्रवासातून फायदा होण्याची शक्मयता आहे. दुसऱयाच्या मदतीने प्रॉपर्टीच्या कामांना गती मिळेल. प्रेमप्रकरणात मनस्ताप होण्याची शक्मयता आहे. गुंतवणुकीपासून दूर रहा. नोकरदार वर्गाला चांगले योग आहेत.
उपाय : विहिरीच्या पाण्यात दोन चमचे दूध सोडा
मकर
तब्येत ठीकठाक असेल. या काळात उत्सवांमध्ये वाढ होईल. धनप्राप्ती उत्तम असल्याने काही चिंता मिटतील. कुटुंबात खेळीमेळीचे वातावरण असेल. प्रॉपर्टी विषयक कामांना सध्या पुढे ढकललेले बरे. प्रेमसंबंधांमध्ये आनंद प्राप्त होईल. गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्मयता आहे. नोकरदार वर्गाने कामात चूक होऊ देऊ नये. वैवाहिक जीवनामध्ये ताण तणाव असण्याची शक्मयता आहे व्यावसायिकांना संधी प्राप्त होतील.
उपाय आंघोळीच्या पाण्यात काळे तीळ घालावे
कुंभ
आरोग्याचा पाया बळकट असला तरी कुपथ्य करू नका. तुमच्या ज्ञानाला योग्य तो वाव मिळेल. आर्थिक प्राप्ती चांगली असेल. या काळात वेगवेगळी व्यंजने खाण्याकडे कल असेल. प्रवासात इजा होणार नाही याची काळजी घ्या. वाहन आणि जमीन यांच्या संदर्भात असलेले प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहेत. शेअर बाजारापासून दूर राहण्यातच शहाणपणा आहे. प्रेमसंबंधांमध्ये समोरच्याच्या चुकीच्या वागण्याचा त्रास होऊ शकतो.
उपाय उडदाचे दान करावे
मीन
स्वतःची काळजी घ्यावी लागेल. कामे मनासारखी पूर्ण होण्याकरता विलंब लागल्याने मन उदास होऊ शकते. कुटुंबातील व्यक्तींशी वाद होऊ शकतो. पैसे कमवण्याकरता कष्ट घ्यावे लागतील. लेखी व्यवहारांमध्ये यश मिळू शकते. कामानिमित्त प्रवास कराल. प्रिय व्यक्तीशी मतभेद घडल्याने मनस्ताप होईल. नोकरदार वर्गाला सावध राहण्याची गरज आहे. वैवाहिक जोडीदाराची मदत मिळेल.
उपाय वाहत्या पाण्यात हळकुंड सोडा