ऑनलाईन टीम / तरुण भारत :
फोन टॅपिंग प्रकरणात सीआरपीएफच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) त्यांची पुन्हा नव्याने चौकशी करण्याचे आदेश पुणे सत्र न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे रश्मी शुक्ला यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
रश्मी शुक्ला यांनी राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुख असताना राज्यातील मोठय़ा नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप आहे. यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार बच्चू कडू, माजी खासदार संजय काकडे, आमदार आशिष देशमुख, खासदार संजय काकडे, एकनाथ खडसे यांचा समावेश होता. हे प्रकरण राज्यात गाजले होते. या प्रकरणी फेब्रुवारी महिन्यात बंडगार्डन पोलिसात रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा शहर पोलीस तपास करत होते. परंतु, राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर रश्मी शुक्ला यांचा तपास पोलिसांनी बंद करण्यासाठी न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. परंतु, न्यायालयाने तो फेटाळून लावला होता. आता या रिपोर्टमध्ये न्यायालयाकडून काही त्रुटी काढण्यात आल्या आहेत. या प्रकरणात आणखी तपास करून त्रुटींची पूर्तता करा व पुन्हा नव्याने अहवाल सादर करा, असे आदेश न्यायालयाने पोलिसांनी दिले आहेत.
अधिक वाचा : जम्मू-काश्मीरमध्ये चकमक; 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यास सुरक्षा दलाला यश
सत्ता बदल झाल्यावर शुक्ला त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची, तर दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यामुळे त्यांच्यावरील चौकशी थांबण्यासाठी हा क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता.