रत्नागिरी/प्रतिनिधी
दि. १४ एप्रिल २०२२ रोजी बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती कोरोनाच्या सावटानंतर पहिल्यांदाच मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
सकाळी ११ च्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करून विविध कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली. यावेळी बौद्ध बांधवांनी शहरातील मारुती मंदिर ते आठवडा बाजार व परत जयस्तंभ अशा मार्गाने मिरवणूक काढली.